शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित गावांच्या विकासाचा प्रश्न निकाली!

By admin | Updated: April 10, 2017 01:35 IST

कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध : निविदा प्रक्रिया पूर्ण; कामांना होणार लवकरच प्रारंभ

वाशिम : सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न आता बहुतांशी निकाली निघाला असून, निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. सुविधांसाठी लागणारा २.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने कामांना लवकरच प्रारंभ होईल, अशी माहिती जलसंपदाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिली.जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पांकरिता दहापेक्षा अधिक गावांचे पुनर्वसन झालेले आहे. त्यात मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पासाठी पाच गावे, रिसोड तालुक्यात पळसखेड प्रकल्पासाठी पळसखेड आणि बिबखेड ही दोन गावे; तर कारंजा तालुक्यात एका गावाचा समावेश आहे. त्यापैकी रिसोड तालुक्यातील मिर्झापूर, पळसखेड, बिबखेड, पांगरखेडा आदी गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर होता. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंबंधी वेळोवेळी केलेले वस्तुनिष्ठ वार्तांकन आणि जलसंपदा विभागाने शासन स्तरावर केलेला पाठपुरावा, यामुळे ५ डिसेंबर २०१६ रोजी तत्त्वत: प्रशासकीय मान्यता आणि आता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून विकासकामांकरिता अपेक्षित २.२५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने संबंधित पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबवून कामांच्या ‘वर्कआॅर्डर’ काढण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली. लवकरच संबंधित गावांमध्ये अपेक्षित विकासकामांना प्रारंभ केला जाईल, असेही ते म्हणाले. बाधित ४६६ कुटुंबांना मिळणार विविध सुविधापुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याकरिता आवश्यक असलेल्या २.२५ कोटी रुपयांच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता आणि निधी मिळाल्यामुळे बाधित ४६६ कुटुंबांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यात विशेषत: गावठानांतर्गत विद्युतीकरण, सुधारित पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम व इतरही अनेक कामे केली जाणार आहेत. रिसोड तालुक्यातील पळसखेड सिंचन प्रकल्प २००६-०७ मध्ये उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे पळसखेड हे गाव अंशत: बुडीत क्षेत्राखाली गेले असून, या गावातील ४९ कुटुंबे यामुळे बाधित झाली आहेत, तसेच बिबखेड हे गाव पूर्णत: बुडीत क्षेत्राखाली असून, गावातील २४८ कुटुंबे बाधित झाली आहेत. दोन्ही गावांमध्ये वाढीव खर्चाच्या कामांसाठी १.१४ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून पळसखेडमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम, विद्युतीकरण, बिबखेडमधील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्युतीकरण व पोच रस्त्याची कामे केली जाणार आहेत. याशिवाय काही नागरी सुविधांच्या दुरुस्तीचाही त्यात समावेश आहे.सिंचन प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या मिर्झापूर, पळसखेड, बिबखेड, पांगरखेड यासह इतर गावांमध्ये विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीस शासनाने सुप्रमा प्रदान केली असून, पुरेसा निधीदेखील प्राप्त झाला आहेत. त्यामुळे संबंधित गावांमध्ये प्रलंबित असलेली तथा रखडलेली कामे विनाविलंब पूर्ण केली जातील. - शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता, वाशिम