शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

निधीअभावी ‘नाफेड’ची खरेदी उधारीवरच!

By admin | Updated: May 17, 2017 01:48 IST

शेतकऱ्यांना महिनाभरापासून चुकारे नाहीत : खरेदी केंद्रांवर ‘टोकन’ घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘नाफेड’च्या खरेदीला मुदतवाढ मिळाली असली तरी, निधीअभावी खरेदी उधारीवरच सुरू आहे. नाफेडला दीड महिन्यापूर्वी तूर विकलेल्या हजारो शेतकऱ्यांना अद्याप चुकारा मिळालेला नाही. त्यामुळे ‘नाफेड’ची खरेदी ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशीच ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना आधार मिळावा, या उद्देशाने शासनाकडून करण्यात येत असलेली शासकीय तूर खरेदी फायद्याऐवजी अडचणीचीच असल्याचे सिद्ध होत आहे. खरेदीसाठी, मोजणीसाठी विलंब आणि विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्यासाठीही तेवढाच विलंब, अशा विविध समस्यांचा सामना शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना करावा लागत आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना पैसा अडका हाती असावा, म्हणून शेतकरी तूर विकण्यासाठी धडपड करीत आहेत; परंतु नाफेडच्या केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना महिना-महिना चुकाराच मिळत नसल्याने ही तूर खरेदी शेतकऱ्यांना अडचणीतच टाकत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ‘आरटीजीएस’ पद्धतीने शेतकऱ्यांचे चुकारे करण्यात आले. मालेगाव येथे १७ मार्चपर्यंत नाफेडने ११ हजार ४०० क्विंटल खरेदी केली. त्यातील सर्व ५४० शेतकऱ्यांना मागील महिन्यात चुकारे अदा केले. तर ६ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन मंडळाने खरेदी केलेल्या ३ हजार ५९९ क्विंटल तुरीचे चुकारे करण्यासाठी आता निधी प्राप्त झाला आहे. त्याशिवाय २९ एप्रिल ते १६ मे पर्यंतच्या काळात या ठिकाणी २८० शेतकऱ्यांकडून ६ हजार ७७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांचे चुकारे करण्यासाठी मात्र अद्याप निधीच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांना आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगरुळपीर येथील शासकीय खरेदी केंद्रावर नाफेडने आतापर्यंत २७ कोटी ७० लाख रुपयांची ५५ हजार ३० क्विंटल तूर खरेदी केली. त्यापैकी १० कोटी २१ लाख प्राप्त झाले तर ६ कोटी ३२ लाख रुपयांचे चुकारे देणे बाकी आहेत. याशिवाय मध्यंतरी महाराष्ट्र पणन संघाने २९ एप्रिल ते ८ मे पर्यंत ३ कोटी १० लाख रुपयांची ७ हजार ३३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्याचे चुकारेही बाकी आहेत. मंगरुळपीर येथील शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांपैकी १ हजार २३४ शेतकऱ्यांचे १० कोटी २ लाख रुपयांचे चुकारे अद्याप बाकी आहेत. कारंजा तालुक्यात नाफेडकडून एप्रिल २२ पर्यंत २१२८ शेतकऱ्यांकडून एकूण १८ कोटी ५६ लाख ५३ हजार ५५० रुपयांची ३६ हजार ७७१ क्विंटल तूर खरेदी केली. त्यातील १७३६ शेतकऱ्यांना १५ कोटी ३२ लाख ६९ हजार ७९३ रुपयांचे चुकारे करण्यात आले, तर त्यातील ३९२ शेतकऱ्यांचे ३ कोटी २४ लाख २३ हजार ७५७ रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहेत. वाशिम येथे २२ एप्रिलपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या एकूण शेतकऱ्यांपैकी ५९ शेतकऱ्यांचे ५२ लाख ५१ हजार २९१ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. त्याशिवाय याठिकाणी महाराष्ट्र पणन मंडळाने ८ मे पर्यंत २१९ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ३९७७ क्विंटल तुरीचे, तसेच त्यानंतर आजवर नाफेड आणि पीपीएस संस्थेने ३१ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ६०९ क्ंिवटल तुरीचे चुकारे बाकी आहेत. यावरून जिल्ह्यात शासनाकडून तुरीची खरेदी करण्यात येत असली तरी, शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना विकलेल्या तुरीचे चुकारे मिळण्यास महिनाभराचा विलंब लागल्यास खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. जिल्ह्यातील नाफेड किंवा शासकीय खरेदी केंद्रात तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धनादेशाने चुकारे केले जात आहेत. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे चुकारे देणे बाकी असले तरी, ते लवकरच अदा करण्यात येतील. शासनाकडून तशी तरतूद करण्यात आली आहे. -ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक वाशिम