शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

पावसासाठी ‘बारीश’वाले बाबांची तपस्या!

By admin | Updated: June 26, 2017 10:08 IST

सात दिवसांपासून अन्नत्याग : सोयता शिवारात साकडे!

लोकमत न्यूज नेटवर्ककोंडाळा महाली: राजस्थानमधील बारीशवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे आनंदराज ऊर्फ जयहरी महाराज यांनी पाऊस यावा यासाठी वाशिम तालुक्यातील सोयता येथील प्रवेश राऊत यांच्या शेतामध्ये १९ जूनपासून अन्नत्याग करीत व मौनव्रत धरून देवाला साकडे घातले आहे. मूळचे पुणे येथील रहिवासी असलेले आनंदराज महाराज यांनी ३० वर्षांपासून घराचा त्याग केला असून, त्यांची सतत भ्रमंती सुरू आहे. ते २००५ मध्ये विदर्भात आले त्यानंतर ते काही वर्षे सोयता येथे रघुनाथ स्वामी संस्थानवर राहिले. त्यांनी सलग तीन वर्षे सोयता येथे अखंड हरिनाम व श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यानंतर ते राजस्थानमध्ये गेले. राजस्थानमध्ये त्यांनी पावसासाठी अनेक वेळा तपस्या केली. तेथे ते बारीशवाले बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. ते राजस्थानमधून ३० मे रोजी पुन्हा विदर्भात आले. अशातच जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली; परंतु पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकू लागली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांची चिंता बारीशवाले बाबांना दिसली. त्यांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी १९ जूनपासून अन्नत्याग करून मौन धरले आहे, तसेच पाऊस पडेपर्यंत स्नान न करण्याचाही त्यांनी संकल्प केला आहे. भर उन्हात उभे राहून त्यांची तपस्या सुरू आहे.