शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

महामार्गाच्या पुलावर साचले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST

---- गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव ...

----

गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे

वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे उकिरडे साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

----

पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय

वाशिम : जिल्ह्यातील पांगरी नवघरेसह इतर अनेक गावांतील जुन्या पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात साहित्य नेण्यात अडचणी येत आहेत.

--------------

इंझोरीत येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इंझोरीसह परिसरातील काही गावांत कृषी विभागामार्फत कीड नियंत्रण आणि तणव्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

-------------------

तलाठ्यांचे शहरातून अपडाऊन सुरूच

वाशिम : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना कामकाज पाहण्यासाठी कार्यालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना शहरी भागातून अपडाऊन करावे लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून काही जण सुटीवर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

--------------

आसेगावात पोलिसांची संख्या अपुरी

वाशिम : आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत ५२ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलिसांवर कायदा- सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.

-------------

नाल्यांत घाण, गावांत अस्वच्छता

वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील मान्सूनपूर्व कामे करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नाल्या खच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतीने मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.

^^^^

जडवाहनांमुळे ग्रामीण रस्त्याची दैना

वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागांतील विविध रस्त्यांवरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौणखनिज नेणारी जडवाहने सतत धावत असल्याने या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.