शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या पुलावर साचले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST

---- गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव ...

----

गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे

वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे उकिरडे साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

----

पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय

वाशिम : जिल्ह्यातील पांगरी नवघरेसह इतर अनेक गावांतील जुन्या पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात साहित्य नेण्यात अडचणी येत आहेत.

--------------

इंझोरीत येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इंझोरीसह परिसरातील काही गावांत कृषी विभागामार्फत कीड नियंत्रण आणि तणव्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

-------------------

तलाठ्यांचे शहरातून अपडाऊन सुरूच

वाशिम : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना कामकाज पाहण्यासाठी कार्यालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना शहरी भागातून अपडाऊन करावे लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून काही जण सुटीवर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

--------------

आसेगावात पोलिसांची संख्या अपुरी

वाशिम : आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत ५२ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलिसांवर कायदा- सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.

-------------

नाल्यांत घाण, गावांत अस्वच्छता

वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील मान्सूनपूर्व कामे करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नाल्या खच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतीने मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.

^^^^

जडवाहनांमुळे ग्रामीण रस्त्याची दैना

वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागांतील विविध रस्त्यांवरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौणखनिज नेणारी जडवाहने सतत धावत असल्याने या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.