शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:28 IST

वाशिम : खासगी कंपन्यांचे बियाणे उगविले नसल्याची तक्रार घेऊन शेतकरी पोलीस ठाण्यात आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी अशा सूचना ...

वाशिम : खासगी कंपन्यांचे बियाणे उगविले नसल्याची तक्रार घेऊन शेतकरी पोलीस ठाण्यात आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी अशा सूचना देतानाच, अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महसूल व कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात १९ जुलैला खरीप पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

खरीप हंगामाची १०० टक्के पेरणी झाली असून, पावसामुळे पिकांची परिस्थिती सध्या चांगली आहे. यंदा बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. तरीही शेतकऱ्यांनी खासगी कंपनीकडून घेतलेले बियाणे उगविले नसल्यास संबंधित शेतकरी खासगी कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करण्यास पोलीस ठाण्यात आल्यास त्याची तक्रार नोंदवून घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्यातील ४ महसूल मंडळातील १५ गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून, पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले. आतापर्यंत ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल त्वरित शासनाला सादर केला जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.

००००००००००

८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार ४६९ शेतकऱ्यांना ६८६ कोटी १५ लाख रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. सुमारे ८० टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले आहे. गतवर्षी १५ जुलैपर्यंत ७२ हजार २० शेतकऱ्यांना सुमारे ५१६ कोटी ७७ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. खासदार गवळी म्हणाल्या, शेतकऱ्यांना बँकांकडून वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक असून, आगामी खरीप हंगामात मे अखेरपर्यंत जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना दिल्या.

००००००००००००००

बियाण्यांच्या दरात मोठी तफावत

आमदार पाटणी म्हणाले, महाबीज व खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या दरात मोठी तफावत आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाबीजचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करून आवश्यक कार्यवाही करावी, तसेच पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँकांकडून दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००००००००