शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर; पुन्हा जाणवणार पाणीटंचाई!

By admin | Updated: January 24, 2017 17:18 IST

जलसंपदा विभागाच्या वतीने यंदा जिल्ह्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि, 24 -  जलसंपदा विभागाच्या वतीने यंदा जिल्ह्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. असे असताना चोरट्या मार्गाने विनापरवाना पाण्याचा बेसुमार उपसा देखील सुरूच असल्यामुळे जिल्ह्यातील १२३ पैकी ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
वाशिम जिल्ह्यात यावर्षी ७४ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांचा पेरा करण्यात आला आहे. या पिकांना जलसंपदा विभागाने सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध करून दिली असून २० हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन प्रकल्पातून ठिबक आणि स्प्रिंकलरव्दारे पाणी सोडले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील अधिकांश सिंचन प्रकल्पांवरून विनापरवाना चोरट्या मार्गाने पिकांच्या सिंचनासाठी पाण्याचा बेसुमार उपसा केला जात असल्याने उन्हाळ्यापूर्वीच प्रकल्प कोरडे पडण्याची भिती वर्तविली जात आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, असे संकेत वर्तविले जात आहेत. 
एकबूर्जी, सोनल या मध्यम प्रकल्पांसह जवळपास ७० लघुप्रकल्पांमधील पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरे तथा नागरिकांसाठी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले आहे. चोरट्या मार्गाने होणाºया पाण्याच्या उपश्यावरही नियंत्रण ठेवण्याचा सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत, असे  शिवाजी जाधव कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम यांनी याविषयी सांगितले.