शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

..अन् अधिका-यांना अर्धवटच सोडावा लागला कार्यक्रम

By admin | Updated: October 14, 2015 00:36 IST

दुष्काळी परिस्थितीवरील कार्यशाळेत शेतक-यांनी अधिका-यांना धरले धारेवर; बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

माटरगाव (जि. बुलडाणा): : दुष्काळी परिस्थितीमुळे होत असणार्‍या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम येथे ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र शेतकर्‍यांसाठी हा कार्यक्रम 'उपाशीपोटी रामायण' ठरल्याने उपाययोजना नसल्याचा तसेच समस्या न सुटल्याचा आरोप करीत अधिकार्‍यांनाच धारेवर धरले त्यामुळे अधिकार्‍यांना कार्यक्रम अर्धवटच सोडून परतीच्या मार्गावर लागावे लागले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शेतकर्‍यांचे मनोबल वाढविण्याच्या अनुषंगाने येथे ११ ऑक्टोबर रोजी आठवडी बाजार परिसरात संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी टाकसाळ, उपजिल्हाधिकारी घेवंदे, तहसीलदार पवार यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे आदी उपस्थित होते. सरपंच वैशाली ठाकरे, उपसरपंच देशमुख, पो.पा. दिलीप देशमुख यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना होत नसल्याचा तसेच पाणी, वीज आदी समस्यांबाबत अधिकार्‍यांकडे प्रश्न मांडले. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने तसेच शेतकरी सामान्य जीवन जगत असतानाही अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना महागडे मोबाईल वापरणे बंद करा, भौतिक सुखावरील खर्च टाळा असे उपदेश केल्याने शेतकरी संतप्त झाले व इतरांची जीवन जगण्याची पध्दत व शेतकर्‍यांचे जीवन यावरील तफावत सांगून संताप व्यक्त केला. अखेर तापलेले वातावरण पाहता अधिकार्‍यांनी कार्यक्रम अध्र्यावर संपवून काढता पाय घेतला. एकूणच येथील कार्यक्रम म्हणजे शेतकर्‍यांना उपाशीपोटी रामायण ऐकविण्याचा झाला, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच आधी शेतकर्‍यांच्या वर्षानुवर्षाच्या असलेल्या समस्या दूर कराव्या, म्हणजेच शेतकर्‍यांचे मनोबल वाढून स्वावलंबी होईल, असे मत सुध्दा शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केले.