शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

..अन् अधिका-यांना अर्धवटच सोडावा लागला कार्यक्रम

By admin | Updated: October 14, 2015 00:36 IST

दुष्काळी परिस्थितीवरील कार्यशाळेत शेतक-यांनी अधिका-यांना धरले धारेवर; बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

माटरगाव (जि. बुलडाणा): : दुष्काळी परिस्थितीमुळे होत असणार्‍या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम येथे ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र शेतकर्‍यांसाठी हा कार्यक्रम 'उपाशीपोटी रामायण' ठरल्याने उपाययोजना नसल्याचा तसेच समस्या न सुटल्याचा आरोप करीत अधिकार्‍यांनाच धारेवर धरले त्यामुळे अधिकार्‍यांना कार्यक्रम अर्धवटच सोडून परतीच्या मार्गावर लागावे लागले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शेतकर्‍यांचे मनोबल वाढविण्याच्या अनुषंगाने येथे ११ ऑक्टोबर रोजी आठवडी बाजार परिसरात संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी टाकसाळ, उपजिल्हाधिकारी घेवंदे, तहसीलदार पवार यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे आदी उपस्थित होते. सरपंच वैशाली ठाकरे, उपसरपंच देशमुख, पो.पा. दिलीप देशमुख यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना होत नसल्याचा तसेच पाणी, वीज आदी समस्यांबाबत अधिकार्‍यांकडे प्रश्न मांडले. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने तसेच शेतकरी सामान्य जीवन जगत असतानाही अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना महागडे मोबाईल वापरणे बंद करा, भौतिक सुखावरील खर्च टाळा असे उपदेश केल्याने शेतकरी संतप्त झाले व इतरांची जीवन जगण्याची पध्दत व शेतकर्‍यांचे जीवन यावरील तफावत सांगून संताप व्यक्त केला. अखेर तापलेले वातावरण पाहता अधिकार्‍यांनी कार्यक्रम अध्र्यावर संपवून काढता पाय घेतला. एकूणच येथील कार्यक्रम म्हणजे शेतकर्‍यांना उपाशीपोटी रामायण ऐकविण्याचा झाला, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच आधी शेतकर्‍यांच्या वर्षानुवर्षाच्या असलेल्या समस्या दूर कराव्या, म्हणजेच शेतकर्‍यांचे मनोबल वाढून स्वावलंबी होईल, असे मत सुध्दा शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केले.