शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

..अन् अधिका-यांना अर्धवटच सोडावा लागला कार्यक्रम

By admin | Updated: October 14, 2015 00:36 IST

दुष्काळी परिस्थितीवरील कार्यशाळेत शेतक-यांनी अधिका-यांना धरले धारेवर; बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

माटरगाव (जि. बुलडाणा): : दुष्काळी परिस्थितीमुळे होत असणार्‍या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम येथे ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र शेतकर्‍यांसाठी हा कार्यक्रम 'उपाशीपोटी रामायण' ठरल्याने उपाययोजना नसल्याचा तसेच समस्या न सुटल्याचा आरोप करीत अधिकार्‍यांनाच धारेवर धरले त्यामुळे अधिकार्‍यांना कार्यक्रम अर्धवटच सोडून परतीच्या मार्गावर लागावे लागले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शेतकर्‍यांचे मनोबल वाढविण्याच्या अनुषंगाने येथे ११ ऑक्टोबर रोजी आठवडी बाजार परिसरात संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी टाकसाळ, उपजिल्हाधिकारी घेवंदे, तहसीलदार पवार यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे आदी उपस्थित होते. सरपंच वैशाली ठाकरे, उपसरपंच देशमुख, पो.पा. दिलीप देशमुख यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना होत नसल्याचा तसेच पाणी, वीज आदी समस्यांबाबत अधिकार्‍यांकडे प्रश्न मांडले. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने तसेच शेतकरी सामान्य जीवन जगत असतानाही अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना महागडे मोबाईल वापरणे बंद करा, भौतिक सुखावरील खर्च टाळा असे उपदेश केल्याने शेतकरी संतप्त झाले व इतरांची जीवन जगण्याची पध्दत व शेतकर्‍यांचे जीवन यावरील तफावत सांगून संताप व्यक्त केला. अखेर तापलेले वातावरण पाहता अधिकार्‍यांनी कार्यक्रम अध्र्यावर संपवून काढता पाय घेतला. एकूणच येथील कार्यक्रम म्हणजे शेतकर्‍यांना उपाशीपोटी रामायण ऐकविण्याचा झाला, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच आधी शेतकर्‍यांच्या वर्षानुवर्षाच्या असलेल्या समस्या दूर कराव्या, म्हणजेच शेतकर्‍यांचे मनोबल वाढून स्वावलंबी होईल, असे मत सुध्दा शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केले.