शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

..अन् अधिका-यांना अर्धवटच सोडावा लागला कार्यक्रम

By admin | Updated: October 14, 2015 00:36 IST

दुष्काळी परिस्थितीवरील कार्यशाळेत शेतक-यांनी अधिका-यांना धरले धारेवर; बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

माटरगाव (जि. बुलडाणा): : दुष्काळी परिस्थितीमुळे होत असणार्‍या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम येथे ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र शेतकर्‍यांसाठी हा कार्यक्रम 'उपाशीपोटी रामायण' ठरल्याने उपाययोजना नसल्याचा तसेच समस्या न सुटल्याचा आरोप करीत अधिकार्‍यांनाच धारेवर धरले त्यामुळे अधिकार्‍यांना कार्यक्रम अर्धवटच सोडून परतीच्या मार्गावर लागावे लागले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शेतकर्‍यांचे मनोबल वाढविण्याच्या अनुषंगाने येथे ११ ऑक्टोबर रोजी आठवडी बाजार परिसरात संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी टाकसाळ, उपजिल्हाधिकारी घेवंदे, तहसीलदार पवार यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे आदी उपस्थित होते. सरपंच वैशाली ठाकरे, उपसरपंच देशमुख, पो.पा. दिलीप देशमुख यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना होत नसल्याचा तसेच पाणी, वीज आदी समस्यांबाबत अधिकार्‍यांकडे प्रश्न मांडले. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने तसेच शेतकरी सामान्य जीवन जगत असतानाही अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना महागडे मोबाईल वापरणे बंद करा, भौतिक सुखावरील खर्च टाळा असे उपदेश केल्याने शेतकरी संतप्त झाले व इतरांची जीवन जगण्याची पध्दत व शेतकर्‍यांचे जीवन यावरील तफावत सांगून संताप व्यक्त केला. अखेर तापलेले वातावरण पाहता अधिकार्‍यांनी कार्यक्रम अध्र्यावर संपवून काढता पाय घेतला. एकूणच येथील कार्यक्रम म्हणजे शेतकर्‍यांना उपाशीपोटी रामायण ऐकविण्याचा झाला, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच आधी शेतकर्‍यांच्या वर्षानुवर्षाच्या असलेल्या समस्या दूर कराव्या, म्हणजेच शेतकर्‍यांचे मनोबल वाढून स्वावलंबी होईल, असे मत सुध्दा शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केले.