शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

बॅरेजेसचे पाणी एकबुर्जीत आणण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:45 IST

वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या निर्णयाला संबंधित गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबतचा सर्व्हे थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा ...

ठळक मुद्देग्रामस्थांचा विरोध, पाणीटंचाईचा प्रश्न पेटणार

वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या निर्णयाला संबंधित गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबतचा सर्व्हे थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.

यंदा अल्प पावसामुळे एकबूर्जी धरणात अतिशय कमी जलसाठा उरला असून, या धरणावर अवलंबून असलेल्या वाशिमक रांना उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून वाशिम शहरातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी तालुक्यातील बॅरेजेसमध्ये उपलब्ध असलेले पाणी एकबुर्जीत आणण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून या कामी सर्व्हेही करण्यात येत आहे; परंतु या निर्णयाला कोकलगाव, वरूड. गणेशपुर, जुमडा आदि गावांतील लोकांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून सर्व्हे थांबविण्याची मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वाशिमची पाणी समस्या सोडविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करावा, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूक