शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जनुन्याला प्रशासनाकडून सापत्न वागणूक

By admin | Updated: November 16, 2014 01:40 IST

मंगरुळपीर तालुक्याती प्रकार, दोन महिन्यांपासून गावातील अंधार कायम.

मंगरुळपीर : तालुक्यातील चोरद गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या जनुना या आदिवासी गावात गेल्या दीड दोन महिन्यांपासून रात्रीची वीज गायब झाल्याने दर्‍या-खोर्‍यातील गाव अंधारात बुडाले आहे. या आदिवासी गावाला सिंगल फेज योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जनुना खु. या १00 टक्के आदिवासी गावाला किन्हीराजा सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जात असून, मागील दीड-दोन महिन्यापासून दिवसा दिल्या जाणार्‍या थ्री फेज वीज पुरवठय़ामुळे तेथील नागरिकांना रात्री अंधाराच्या काळोख्यात जीवन जगावे लागत आहे, या गावाला सिंगल फेज योजनेचा लाभ देण्यात यावा, याकरिता जिल्हाधिकारींना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तेथील आदिवासी समाज बांधव अनेक समस्यांचा सामना करीत असून, त्यांना न्याय देण्यासाठी कोणाचाच पुढाकार मिळत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावाला अद्यापही पक्का रस्ता नाही, त्यामुळे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर त्यांना बहिष्कार टाकावे लागले. बहिष्कारानंतर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष देईल, अशी त्यांना आशा होती; परंतु प्रशासनाकडून अधिकच दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही तेथील नागरिक करीत आहेत.