शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

शेतकऱ्यांसाठी कारंजा तहसील कार्यालयासमोर 'प्रहार'चे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST

कारंजा तालुक्यातील कामठवाडा, आखतवाडा, जांब, पिंपळगाव (गुंजाटे), बोरव्हा, दादगाव, ममदाबाद (धोनी), गंगापूर व उंबर्डा बाजार येथील शेतकरी बांधवांनी पीक ...

कारंजा तालुक्यातील कामठवाडा, आखतवाडा, जांब, पिंपळगाव (गुंजाटे), बोरव्हा, दादगाव, ममदाबाद (धोनी), गंगापूर व उंबर्डा बाजार येथील शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत पीक नुकसानीबाबत ई-मेल व कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाद्वारे तक्रार देऊनही नुकसानभरपाई मिळाली नाही. सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून दिली व त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी १९ जानेवारीला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी अर्जुन सोडा यांच्या समवेत कृषी कार्यालयात सदर प्रकरणासंबंधी माहिती घेतली असता कंपनीच्या प्रतिनिधीने कंपनीकडून खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत पीक नुकसानीचे प्राप्त झालेले अर्ज व झालेल्या पिकाचे पंचनामे व नुकसानभरपाई पात्र व भरपाई अदा केल्याचे एकूण सर्व शेतकऱ्यांची यादी त्यांना प्राप्त झाल्याची माहिती मेलद्वारे दाखविली. सदर यादी तपासली असता वरील गावातील शेतकऱ्यांनी ई-मेल व टोल फ्री क्रमांकावर पीक नुकसान झाल्याबाबत तक्रार करूनही उपरोक्त गावे सूचनापत्र यादीत समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आले. सर्व पुरावेही आम्ही निवेदनासोबत संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते व त्यावरून स्पष्टपणे निदर्शनास येते की कंपनीला पीक नुकसान झाल्याबाबत तक्रार करूनही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापासून वंचित ठेवले आहे.

२ महिन्यांचा कालावधी जाऊनही शासन-प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत उपरोक्त गावातील शेतकरी बांधवांना पीक नुकसान मिळत नाही तेव्हापर्यंत उपाेषण सुरू ठेवण्याचा निर्धार प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.