शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पूर्वसूचना न देता तोडला जातोय कृषीपंपाचा वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; ...

विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; मात्र नऊच दिवसांनंतर १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून विद्युत देयक वसुलीचे फर्मान सोडले. यासंबंधीचे आदेश जिल्हास्तरावर धडकले असून, वाशिम मंडळाकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात १२ हजार १५६, रिसोड तालुक्यातील ११ हजार ५८६, मंगरूळपीर ९ हजार २०६, कारंजा ११ हजार ३७२, मानोरा ७ हजार ३१८ आणि मालेगाव तालुक्यात १० हजार ५८, अशा एकूण ६१ हजार ६९६ कृषिपंपधारक ग्राहकांना ६ हजार ८६१ कृषिपंप रोहित्रांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ११ मार्चअखेर थकबाकीदार असलेल्या १० हजार ४६२ कृषिपंपधारक ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून कापण्यात आला. त्यापैकी ६० ग्राहकांनी चार लाख रुपये रकमेचा भरणा केला असून, उर्वरित ग्राहकांचा विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी महावितरणच्या पथकाने कुठलीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत असून, आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीप्रत शेतकरी पोहोचले आहेत.

..................

बॉक्स :

११ मार्चअखेर तोडलेला वीज पुरवठा (तालुकानिहाय)

वाशिम - ४१६

रिसोड - १२४२

मंगरूळपीर - ३६५

कारंजा - ९६७

मानोरा - १६३९

मालेगाव - ५८३३

...............................

कोट :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्च रोजी विद्युत पुरवठा तोडण्यास स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत ऊर्जामंत्र्यांनी स्थगिती उठवून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही हाती घेतली. कोरोनाच्या संकटामुळे आधीच जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारवाई न थांबविल्यास आंदोलन उभारण्यात येईल.

- राजू वानखेडे

संस्थापक, शेतकरी संघर्ष संघटना, वाशिम

...........

कोट :

महावितरणकडून अचानक सुरू झालेला विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईने शेतकरी धास्तावले आहेत. भाजीपाला व फळपिकांचे यामुळे अतोनात नुकसान होणार आहे. धडक कारवाई करण्यापेक्षा काही दिवसांची मुदत देऊन तथा पूर्वसूचना देऊनच कारवाई सुरू व्हायला हवी होती. याप्रकरणी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.

- विष्णुपंत भुतेकर

संस्थापक, भूमिपुत्र शेतकरी संघटना, वाशिम