शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एकाच फिडरवरून २१ गावांना वीजपुरवठा

By admin | Updated: June 15, 2014 01:13 IST

साखरडोहसह येथून विद्युत पुरवठा होणार्‍या २१ गावांना दररोज आपली रात्र अंधारात काढावी लागत आहे.

साखरडोह : मानोरा तालुका वीज वितरण कंपनी अंतर्गत साखरडोह येथील ३३ केव्ही विद्यूत उपकेंद्रात महावितरणच्या अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे साखरडोहसह येथून विद्युत पुरवठा होणार्‍या २१ गावांना दररोज आपली रात्र अंधारात काढावी लागत आहे. येथील३३ केव्ही विद्यूत उपकेंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे गावठाण फिडर, कृषीपंप फिडर वशेंदूरजना फिडरमधून विद्यूत पुरवठा होतो. परंतु त्यामधील साखरडोह फिडर व कृषीपंप फिडर हे दोन फिडर गेल्या तीन महिन्यापाून तांत्रिक अडचणीमुळे बिघडलेले आहेत. त्यामुळे या दोन बिघाड झालेल्या फिडरचा भार व्यवस्थित असलेल्या एका फिडरवर टाकण्यात आला आहे.त्यामुळे विजेचा लोड वाढून वीजपुरवठा खंडित होणे किंवा वारा आला की तारा तुटणे, विद्यूत पुरवठा दर १0 ते १५ मिनिटाला खंडित होणे, लाईन ट्रिप न होणे, स्पार्किंग होणे अशा अनेक समस्याला ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यातच ३३ केव्ही विद्यूत उपकेंद्रातील महत्वाची मशिन असलेल्या पावर ट्रान्सफार्मरमधून गेल्या दोन-तीन महिन्यापासून ऑईलची गळती होत आहे. त्यासाठी येथील यंत्रचालकांनी वारंवार वरिष्ठांशी तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले जात नाही. परिणामी पावसाळा सुरू होताना सुटणार्‍या वार्‍यामुळे तारा तुटणे, झाड पडणे, स्पार्किंग होणे, वीजपुरवठा खंडित होणे .त्यामुळे ग्राहक परेशान झाले आहेत. उपकेंद्रातील रात्रीच्या वेळी काही बिघाड झाल्यास २१ गावांना विद्यूत पुरवठा करणार्‍या उपकेंद्रात कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते.व्हीसीबी मशिन खराब असून त्या दुरूस्त करण्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. गावामध्ये विद्युत पुरवठा करणार्‍या डीपीला फ्यूज नाहीत. त्याकडे लक्ष नाही. ग्राहकांना महिना न भरताच बिल देणार्‍या महावितरणचे मात्र ग्राहकांना वीज देण्याकडे लक्ष नाही. एखाद्या अभियंत्याला विचारणा केली तर आम्ही वरिष्ठांना सांगितले आहे. एक-दोन दिवसात होणार, कर्मचारी पाठविले अशी उत्तरे देतात. प्रत्यक्षात मात्र काहीही नाही, त्यातच साखरडोह उपकेंद्रातील यंत्रचालकांनी विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होणे त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागतो. म्हणून जोपर्यंत ही कामे व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. साखरडोह गावठाण फिडर व्यवस्थित न केल्यास, पावर ट्रान्सफार्मरमधून जाणारे ऑईलचे काम न केल्यास, डीपीमध्ये फ्यूज बॉक्स व वाढीव डीपी न दिल्यास नागरिक आपण आता मानोरा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊ अशी चर्चा करू लागले आहेत.