शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

११३0 शेतक-यांची वीज जोडणी रखडली

By admin | Updated: May 18, 2015 01:36 IST

रिसोड तालुक्यातील प्रकार ; शेतक-यांच्या हिरव्या स्वप्नाचा भंग.

निनाद देशमुख /रिसोड: शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीचा ह्यशॉकह्ण बसत आहे. रिसोड तालुक्यातील एकूण ११३0 शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी रखडली असल्याची माहिती हाती आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी शेतामध्ये नानाविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत. कृषी विभागाकडून या प्रयोगाला प्रोत्साहन मिळत असले तरी वीज वितरण कंपनीकडून मात्र योग्य सहकार्य मिळत नसल्याचा प्रत्यय शेतकर्‍यांना येत आहे. रिसोड तालुक्यातील ११३0 शेतकर्‍यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोडकडे २0१२ ते एप्रिल २0१५ या दरम्यान अर्ज सादर केले जात आहे; मात्र या शेतकर्‍यांना अद्यापही वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न करपून जात आहे. कृषी पंप वीज जोडणीचे काम औरंगाबादच्या एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती रिसोड शाखेचे अभियंता सी.एम. पाठक यांनी दिली आहे.कोरडवाहू शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. या पृष्ठभूमीवर अनेक शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत आहेत. रिसोड तालुक्यात विहिरीद्वारे सिंचन करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या बर्‍यापैकी आहे. विहिरीवर कृषी पंप वीज जोडणी घेऊन शेती फुलविण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच २0१२ नंतर आतापर्यंंत ११३0 अर्ज कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोड या कार्यालयात प्राप्त झाले आहेत; मात्र या अर्जावर कुठलाही विचार नसल्याचे दिसून येत आहे. ३१ डिसेंबर २0१२ पर्यंतची कृषी पंप वीज जोडणीची कामे हाती घेण्यात आली आहे, असे अभियंता सी.एम. पाठक यांचे म्हणणे आहे. कृषी पंप वीज जोडणीच्या कामात एवढा विलंब कशासाठी असा, प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.