शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

११३0 शेतक-यांची वीज जोडणी रखडली

By admin | Updated: May 18, 2015 01:36 IST

रिसोड तालुक्यातील प्रकार ; शेतक-यांच्या हिरव्या स्वप्नाचा भंग.

निनाद देशमुख /रिसोड: शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीचा ह्यशॉकह्ण बसत आहे. रिसोड तालुक्यातील एकूण ११३0 शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी रखडली असल्याची माहिती हाती आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी शेतामध्ये नानाविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत. कृषी विभागाकडून या प्रयोगाला प्रोत्साहन मिळत असले तरी वीज वितरण कंपनीकडून मात्र योग्य सहकार्य मिळत नसल्याचा प्रत्यय शेतकर्‍यांना येत आहे. रिसोड तालुक्यातील ११३0 शेतकर्‍यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोडकडे २0१२ ते एप्रिल २0१५ या दरम्यान अर्ज सादर केले जात आहे; मात्र या शेतकर्‍यांना अद्यापही वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न करपून जात आहे. कृषी पंप वीज जोडणीचे काम औरंगाबादच्या एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती रिसोड शाखेचे अभियंता सी.एम. पाठक यांनी दिली आहे.कोरडवाहू शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. या पृष्ठभूमीवर अनेक शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत आहेत. रिसोड तालुक्यात विहिरीद्वारे सिंचन करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या बर्‍यापैकी आहे. विहिरीवर कृषी पंप वीज जोडणी घेऊन शेती फुलविण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच २0१२ नंतर आतापर्यंंत ११३0 अर्ज कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोड या कार्यालयात प्राप्त झाले आहेत; मात्र या अर्जावर कुठलाही विचार नसल्याचे दिसून येत आहे. ३१ डिसेंबर २0१२ पर्यंतची कृषी पंप वीज जोडणीची कामे हाती घेण्यात आली आहे, असे अभियंता सी.एम. पाठक यांचे म्हणणे आहे. कृषी पंप वीज जोडणीच्या कामात एवढा विलंब कशासाठी असा, प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.