शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पाणंद रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST

महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार शेतीसाठी लागणाऱ्या रस्त्यासंदर्भात काही अटी व नियम ठरवून देण्यात आले आहेत. याबाबतचे सर्व अधिकार महसूल ...

महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार शेतीसाठी लागणाऱ्या रस्त्यासंदर्भात काही अटी व नियम ठरवून देण्यात आले आहेत. याबाबतचे सर्व अधिकार महसूल खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत उदासीन आहेत. पाणंद रस्ता ही शेतीसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. कुठल्याही हंगामात शेतकऱ्यांना साहित्य, अवजारांची नेआण करण्यासह वहिवाटीसाठी हक्काचा रस्ता असणे आवश्यक आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील ९५ टक्के कुटुंब शेती व्यवसायावर निर्भर आहेत. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र मोठा कालावधी उलटूनही शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य असे पाणंद रस्ते शेतकऱ्यांना नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त असून, पाणंद रस्त्याविना शेती करावी तरी कशी, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

--------

पाणंद रस्त्यांना दलदलीचे रूप

मालेगाव तालुक्यात पाणंद रस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांना दलदलीचे रूप प्राप्त होते आणि शेतकऱ्यांना गुडघाभर चिखल तुडवत जावे लागते. या रस्त्यांवर वाहने चालविणे अशक्य असून, बैलगाडी तर चिखलातच रुतून बसते. त्यामुळे विविध कामांसाठी आवश्यक साहित्याची डोक्यावरून ने-आण करावी लागते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, मात्र याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही.

250721\img-20210725-wa0061.jpg

पांदण रस्ते