शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ग्रामस्थांच्या श्रमदानातील तळे ठरले वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:26 IST

अभिनेता आमीर खानच्या पानी फाउंडेशन संस्थेने सन २०१६ ते २०१९ दरम्यान सलग तीन वर्षे राज्यात वॉटर कप स्पर्धेचे आयोजन ...

अभिनेता आमीर खानच्या पानी फाउंडेशन संस्थेने सन २०१६ ते २०१९ दरम्यान सलग तीन वर्षे राज्यात वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले. राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या संस्थेने केलेली जलसंधारणाची कामे स्पर्धेत सहभागी झालेल्या हजारो गावांसाठी वरदानच ठरल्याचे दिसत आहे. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु. येथेही सन २०१७-१८च्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत ८० चौरस फूट लांब-रुंद आणि १० फूट खोल, तसेच ४० चौरस फूट लांब-रुंद आणि १० फूट खोल, अशा दोन शिवार तळ्यांची कामे श्रमदानातून करण्यात आली. या कामांसाठी जेसीबी, पोकलन या मशीनचाही आधार घ्यावा लागला; परंतु महत्त्वाचा ठरला तो ग्रामस्थांचा निर्धार, पानी फाउंडेशनच्या टीमचे मार्गदर्शन आणि सहकार्य. त्यामुळेच हे दोन्ही तळे आकार घेऊ शकले. यात गतवर्षी भारतीय जैन संघटनेकडूनही जेसीबी पुरवून या तळ्यांचे आणखी खोदकाम केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात हे दोन्ही तळे काठोकाठ भरले आणि परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली.

^^^^

तीन वर्षांपासून पाणीटंचाई नियंत्रित

वॉटर कप स्पर्धेंतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे धनज बु. येथे नेहमी उद‌्भवणारी पाणीटंचाईची समस्या २०१९नंतर आजवर जाणवली नाही. शिवाय शेतकऱ्यांना सिंचनासाठीही मोठा आधार झाला. आता यंदाच्या पावसानेही हे दोन्ही तळे काठोकाठ भरले आहेत. या तळ्यांमुळे धनज बु. परिसर आता सुजलाम, सुफलाम झाल्याचे दिसत आहे.