शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मतदान सक्तीचे करावे

By admin | Updated: October 14, 2014 01:48 IST

वाशिम जिल्ह्यातील तरूणाईचा सूर; मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद

वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामधून मतदारांची जागृती होत असल्यामुळे प्रशासनाचे हे प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे योग्य आहे; मात्र देशातील लोकशाहीची वीण अधिक घट्ट करायची असेल तर मतदान सक्तीेचे करण्यात यावे, असाच काहीसा सूर शहरातील तरूणाईमध्ये सुरू आहे. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सक्तीच्या मतदानासाठी भारताच्या राज्यघटनेत दुरूस्ती करण्यात यावी, असेही मत यावेळी तरूणाईने नोंदविले. मतदान हे कर्तव्य समजून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. असे असले तरी मतदानाची टक्केवारी वाढण्याऐवजी ती घटत चालली आहे. याची गांभिर्याने दखल घेत भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. नेमकी हीच बाब हेरून लोकमतने मतदान सक्तीचे करावे काय, हा विषय घेऊन तरूणाईची मतं जाणून घेतली. यामध्ये ६८ टक्के युवकांनी मतदान सक्तीचे करण्यात यावे, असे मत नोंदविले. तरूणाई एवढय़ावरच थांबली नाही तर, घटनेत दुरूस्ती करून सक्तीचे मतदान करावे, ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही, अश्या मतदारांना शासकीय योजनांचा लाभच देऊ नये, असे मतही तब्बल ७४ टक्के तरूणांनी व्यक्त केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्‍या मतदार जागृती अभियानाचेही ५३ टक्के युवकांनी कौतुक केले आहे.