शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

मतदान सक्तीचे करावे

By admin | Updated: October 14, 2014 01:48 IST

वाशिम जिल्ह्यातील तरूणाईचा सूर; मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद

वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामधून मतदारांची जागृती होत असल्यामुळे प्रशासनाचे हे प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे योग्य आहे; मात्र देशातील लोकशाहीची वीण अधिक घट्ट करायची असेल तर मतदान सक्तीेचे करण्यात यावे, असाच काहीसा सूर शहरातील तरूणाईमध्ये सुरू आहे. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सक्तीच्या मतदानासाठी भारताच्या राज्यघटनेत दुरूस्ती करण्यात यावी, असेही मत यावेळी तरूणाईने नोंदविले. मतदान हे कर्तव्य समजून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. असे असले तरी मतदानाची टक्केवारी वाढण्याऐवजी ती घटत चालली आहे. याची गांभिर्याने दखल घेत भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. नेमकी हीच बाब हेरून लोकमतने मतदान सक्तीचे करावे काय, हा विषय घेऊन तरूणाईची मतं जाणून घेतली. यामध्ये ६८ टक्के युवकांनी मतदान सक्तीचे करण्यात यावे, असे मत नोंदविले. तरूणाई एवढय़ावरच थांबली नाही तर, घटनेत दुरूस्ती करून सक्तीचे मतदान करावे, ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही, अश्या मतदारांना शासकीय योजनांचा लाभच देऊ नये, असे मतही तब्बल ७४ टक्के तरूणांनी व्यक्त केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्‍या मतदार जागृती अभियानाचेही ५३ टक्के युवकांनी कौतुक केले आहे.