शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कापशी गावात पोलिसांचा धुडगूस !

By admin | Updated: April 23, 2015 02:23 IST

अकोला जिल्ह्यातील प्रकार प्रकार; गर्भवती महिला, वृद्धांनाही मारहाण

सचिन राऊत/ अकोला : शहरापासून जवळच असलेल्या कापशी (जुनी) गावात मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्यानंतर, पोलिसांनी गावात रात्रभर धुडगूस घातला. तब्बल २00 पोलिसांच्या जमावाने १00 हून अधिक दुचाकींची तोडफोड केली. गरोदर महिला, वृद्ध, मुलांना घराबाहेर काढून, तर काहींच्या घरात घुसून पोलिसांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांच्या या ह्यगुंडगिरीह्णने संपूर्ण गाव दहशतीत आहे. गृहराज्यमंत्री (शहर) व अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घटनेची माहिती घेतली असून निष्पाप ग्रामस्थांना त्रास देणे मुळीच सर्मथनीय नसल्याचे स्पष्ट केले. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कापशी येथील तलावाच्या काठावर दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुगार खेळला जातो. जुगाराचे प्रमाण एवढे मोठे असते की, परिसराला यात्रेचे स्वरूप येते. मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी पातूर पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी किरकोळ कारवाई केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने साध्या वेशात छापा मारला. त्यात काही जुगार्‍यांवर कारवाई केल्यानंतर विशेष पथक व यात्रेकरूंमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र त्यानंतर तब्बल २00 पोलिसांचा ताफा कापशी येथे धडकला. त्यांनी संपूर्ण गावात प्रचंड नासधूस व तोडफोड केली. जयश्री विवेक मानतकर या गरोदर महिलेच्या पोटावर पोलिसांनी काठय़ा टोचल्या. पोलिसांना रोखणार्‍या विवेक मानतकर यांनाही बेदम मारहाण केली, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी १00 ते १५0 ग्रामस्थांनी पोलीस पथकावर हल्ला केला. त्यात १0 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगीतले. घटनेनंतर काही पोलीस कर्मचारी सापडत नव्हते, त्यांचा गावात शोध घेताना ग्रामस्थांनी पुन्हा पोलिसांवर हल्ला केला. याप्रकरणी आठ जणांवर कारवाई करण्यात आली. गावात घडलेल्या प्रकारात पोलीस दोषी असतील, तर त्यांचीही वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घडलेला प्रकार प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. परंपरेनुसार काही गोष्टी चालत असतील, त्यावेळी काही चुकीचे होत असेल, तर पोलिसांनी जाऊन रीतसर सांगायला हवे होते. साध्या वेशात जाऊन कारवाई करणे योग्य नाही.

*ग्रामस्थांवरच गुन्हे

    जुगार अड्डय़ावर छापा मारणार्‍या पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी १00 ते १५0 ग्रामस्थांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. पोलिसांनी आठ ग्रामस्थांना अटकही केली.