शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात न्युमोनिया, मधुमेह सर्वात पुढे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:45 IST

वाशिम : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यातच न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका ...

वाशिम : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यातच न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक संभवतो. १ मार्च ते २७ एप्रिल या दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे ११० रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये जवळपास ९२ टक्के मृतांना न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारही होते.

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचा आकडाही वाढला. त्यानंतर मात्र कोरोनाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा अल्पायुषी ठरला असून, फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यापासून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नेमके कोणत्या कारणाने मृत्यू होत आहेत यामागील कारणे आरोग्य विभागाने जाणून घेतली असता, न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जवळपास ९२ टक्के मृत्यू पावलेल्या रुग्णांना न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयविकार आदी आजार असल्याचे समोर आले. जिल्ह्यात कोरोनामुळे मार्च महिन्यात २७ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात २७ तारखेपर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाशिवाय अन्य कोणताही आजार नसलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, न्युमोनिया, हृदयविकार, किडनी आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडणे, कुणाच्याही संपर्कात न येणे, नियमित औषधोपचार घेणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वेळीच निदान व उपचार मिळाले तर रुग्ण या आजारातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येताच तातडीने कोरोना चाचणी करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

००००

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?

कोरोनाकाळात प्रत्येक व्यक्तीने आरोग्याप्रति जागरूक राहणे ही काळाची गरज ठरत आहे. विशेषत: न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांच्या संपर्कात येऊ नये. घरात वयोवृद्ध आई-वडील, व्याधीग्रस्त नागरिक असतील तर युवावर्गानेदेखील आपल्यापासून घरातील ज्येष्ठांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.

००००

मार्च, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील एकूण मृत्यू १३२

इतर आजारामुळे २२

कोरोनामुळे मृत्यू ११०

००००