शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्लास्टिक बंदीमुळे दूधडेअरीवाले अडचणीत: भांडे घेऊन येण्याची सुचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 18:42 IST

दूधडेअरीधारकांनी प्लास्टिकचा त्याग केला असून, आता ग्राहकांना दुधासाठी घरूनच भांडे आणण्याची सुचना ते करीत आहेत.

ठळक मुद्देव्यावसायिक प्लास्टिकपासून चार हात दूरच झाले आहेत, तर ग्राहकांनीही प्लास्टिकचा हट्ट सोडला आहे;धान्य, कपडे, फळे यासाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सहज शक्य असला तरी, तरल पदार्थांच्या खरेदी विक्रीत मात्र प्लास्टिकबंदीने मोठी पंचाईत केली आहे.प्लास्टिक पिशव्या बंद केल्या असून, दुधासाठी येणाºया ग्राहकांना ते भांडे घेऊन येण्याच्या सुचना करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यभरात प्लास्टिक बंदीची मोहिम कठोरपणे राबविण्यात येत असताना विविध व्यावसायिकांनी त्याचा मोठा धसका घेतला आहे. तथापि, जड पदार्थांची बांधणी करण्यासाठी कागदी पिशव्या, कापडी पिशव्यांसारखे पर्याय असले तरी तरल पदार्थ त्यातही प्रामुख्याने दूधाच्या विक्रीत मोठ्या अडचणी आल्या आल्या आहेत. दूधडेअरीधारकांनी प्लास्टिकचा त्याग केला असून, आता ग्राहकांना दुधासाठी घरूनच भांडे आणण्याची सुचना ते करीत आहेत.राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी मोहिमेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह संबंधित प्रशासनाकडून बाजारपेठा, किरकोळ दुकाने, भाजीबाजारांवर बारिक नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. प्लास्टिकचा वापर करणाºयाला ५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद असून, त्याचा फटकाही अनेकांना या बंदीच्या पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळाला. त्यामुळे व्यावसायिक प्लास्टिकपासून चार हात दूरच झाले आहेत, तर ग्राहकांनीही प्लास्टिकचा हट्ट सोडला आहे; परंतु भाजीपाला, धान्य, कपडे, फळे यासाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सहज शक्य असला तरी, तरल पदार्थांच्या खरेदी विक्रीत मात्र प्लास्टिकबंदीने मोठी पंचाईत केली आहे. यामध्ये दूधडेअरीधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी आकारमानानुसार प्लास्टिक पिशवीत दूध मोजून देऊन ते जागेवरच सीलही करून दिले जायचे; परंतु आता मात्र प्लास्टिक बंदी झाल्याने त्यांनी प्लास्टिक पिशव्या बंद केल्या असून, दुधासाठी येणाºया ग्राहकांना ते भांडे घेऊन येण्याच्या सुचना करीत आहेत.  प्लास्टिकचा खर्च वाचला; परंतु मशीनचा बोजा वाढला.शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना एकतर कागदात वस्तू बांधून देत आहेत किंवा पिशव्या आणण्याच्या सुचना करीत आहेत. त्यामुळे त्यांचा प्लास्टिकचा खर्च वाचला आहे. दूधडेअरीधारकांना या बंदीचा एकप्रकारे मोठा फायदाच झाला असे म्हणता येईल. कारण जडवस्तूंसाठी पूर्वीही व्यावसायिक पेपरची रद्दी वापरत किं वा खरेदीचे प्रमाण अधिक असले तर ग्राहकही कापडी पिशव्या नेत असत. दुधडेअरीत मात्र केवळ प्लास्टिकचाच अधिक वापर होत असे. आता प्लास्टिकबंदीमुळे त्यांचा मोठा खर्च वाचला; परंतु प्लास्टिकमध्ये दूध टाकल्यानंतर ते सील करण्यासाठी घेतलेल्या मशीन मात्र निकामी झाल्या आहेत. त्या कोणी विकतही घेणार नसल्याने या मशीनचा बोजाच दूधडेअरीधारकांना झाला आहे.

टॅग्स :Washim Anti corruption departmentवाशिम लाच-लुचपत प्रतिबंधक विभागmilkदूध