शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

वृक्षारोपण सप्ताहाचा उद्या समारोप

By admin | Updated: July 6, 2017 00:39 IST

चार कोटी वृक्ष लागवड मोहीम : विविध कार्यालयांप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या पृष्ठभूमीवर राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १ जुलैपासून सुरू झालेल्या वृक्षारोपण सप्ताहाची सांगता ७ जुलै रोजी होणार आहे.वाशिम जिल्ह्यात पाच लाखांवर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. १ जुलैपासून विविध शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत वृक्षारोपण केले जात आहे. ४ जुलैपर्यंत ४ लाख २० हजारांवर वृक्षारोपण झाले आहे. ७ जुलैपर्यंत उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. प्रत्येकाने ७ जुलैपर्यंत किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय करावा. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, त्यासाठी प्रत्येकाच्या कृतिशील प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, वन विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग, शिक्षणाधिकारी कार्यालय यासह निमशासकीय कार्यालये व स्वयंसेवी संघटनेमार्फत वृक्षारोपण केले जात आहे. ७ जुलैपर्यंत ही मोहीम असून, त्यानंतरही स्वेच्छेने वृक्षारोपण करता येणार आहे.वाशिम तालुक्यातील काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रमाला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच स्थानिक नालंदानगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात १९ जूनपासून धम्मसंस्कार वर्ग सुरु करण्यात आले आहेत.या धम्मसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांच्या हस्ते २ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. भंते अश्वजित यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला पिंपळ, बोधीवृक्ष, निंब व सिरसम या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भन्ते यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी बहुसंख्य गावकरी मंडळीची उपस्थिती होती.