शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

वृक्षारोपण सप्ताहाचा उद्या समारोप

By admin | Updated: July 6, 2017 00:39 IST

चार कोटी वृक्ष लागवड मोहीम : विविध कार्यालयांप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या पृष्ठभूमीवर राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १ जुलैपासून सुरू झालेल्या वृक्षारोपण सप्ताहाची सांगता ७ जुलै रोजी होणार आहे.वाशिम जिल्ह्यात पाच लाखांवर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. १ जुलैपासून विविध शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत वृक्षारोपण केले जात आहे. ४ जुलैपर्यंत ४ लाख २० हजारांवर वृक्षारोपण झाले आहे. ७ जुलैपर्यंत उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. प्रत्येकाने ७ जुलैपर्यंत किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय करावा. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, त्यासाठी प्रत्येकाच्या कृतिशील प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, वन विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग, शिक्षणाधिकारी कार्यालय यासह निमशासकीय कार्यालये व स्वयंसेवी संघटनेमार्फत वृक्षारोपण केले जात आहे. ७ जुलैपर्यंत ही मोहीम असून, त्यानंतरही स्वेच्छेने वृक्षारोपण करता येणार आहे.वाशिम तालुक्यातील काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रमाला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच स्थानिक नालंदानगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात १९ जूनपासून धम्मसंस्कार वर्ग सुरु करण्यात आले आहेत.या धम्मसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांच्या हस्ते २ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. भंते अश्वजित यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला पिंपळ, बोधीवृक्ष, निंब व सिरसम या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भन्ते यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी बहुसंख्य गावकरी मंडळीची उपस्थिती होती.