शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

राजूरा येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:37 IST

राजुरा गावात पाणीटंचाई आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावात टँकर हे समीकरण गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून कायम आहे. राजुरा गाव परिसरातील छोट्या ...

राजुरा गावात पाणीटंचाई आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावात टँकर हे समीकरण गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून कायम आहे. राजुरा गाव परिसरातील छोट्या मोठ्या नदी नाल्यांवर सिंचन, पाझर तथा गावतलाव होण्यास मोठा वाव आहे; मात्र सक्षम राजकीय नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे आजवर हा प्रश्न निकाली निघालेला नाही. गाव परिसरात जलसंधारणाची कोणतीच कामे झालेली नाहीत, त्यामुळे पावसाळ्याचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. परिणामी, भूजल पातळी कमालीची खोल गेली आहे.

गावात ५०० फुटावर कुपनलिका घेऊनही पाण्याचा थेंबदेखील उपलब्ध होत नसल्याने अलीकडे गावात कुपनलिका घेण्यास कोणीच धजावत नसल्याचे चित्र आहे. गावातील जनतेची तहान कायमस्वरूपी भागविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभाताई घुगे यांनी शासनदरबारी वजन खर्ची घालून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून करोडो रुपयांची पाणी पुरवठा योजना गावासाठी मंजूर करून घेतली. सदर योजनेचे काम गत वर्षभरापासून सुरू असून, अंतिम टप्प्यात आले आहे. ही योजना पूर्ण झाल्यास जनतेची कायमस्वरूपी समस्या निकाली निघणार आहे. सद्य:स्थितीत मात्र नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, गावात टँकरद्वारा पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.

.................

कोट :

राजुरा येथे यंदाही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून टँकरचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तहसीलकडे पाठविण्यात आला आहे. वरिष्ठांनी लवकर गावात टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.

- आरती प्रकाश बोरजे

ग्रा.पं.सदस्य, राजुरा.