शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा पून्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

काजळेश्वर उपाध्ये : महावितरणने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटरची व ग्रामपंचायत भवनाचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावात नळयाेजनेव्दारा पाणी पुरवठा ...

काजळेश्वर उपाध्ये : महावितरणने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटरची व ग्रामपंचायत भवनाचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावात नळयाेजनेव्दारा पाणी पुरवठा पुन्हा बंद पडला आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

काजळेश्वर ग्रामपंचायतीकडे महावितरणचे साडेआठ लाख रुपये थकीत असल्याने वीज पुरवठा कापण्यात आला आहे. काजळेश्वर ग्रामवासीयांना नळयोजनेद्वारा ग्रामपंचायत घरोघरी पाणीपुरवठा करते. मात्र, गत सात दिवसांपूर्वी महावितरणने थकीत बिलामुळे २९ जूनपासून सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असल्याचे चित्र आहे. मागे तीन महिन्यांपूर्वी अंशत: बिल ग्रामपंचायतीने भरल्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र, मोठी थकबाकी असल्याने पुन्हा महावितरण कारंजाने काजळेश्वर ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला. तेव्हा गावकऱ्यांची पाणी समस्या ग्रामपंचायत प्रशासन, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव डोंगरदिवे, पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे यांच्यासह गावातील समाजसेवी मंडळीनी पुढाकार घेऊन सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थ तथा प्रहार जनशक्तीच्या सेवकांनी केली आहे. ग्रामपंचायतीने थकीत रक्कम भरून ग्रामस्थांची हाेणारी गैरसाेय थांबिवण्याची मागणी हाेत आहे.

...........

सात दिवसांपासून नळ योजना बंद

सात दिवसांपासून नळ योजना बंद असल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. पाण्याचे स्रोत गावात पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. शेतकरी, शेतमजूर यांचे सध्या शेतीकामाचे दिवस आहेत. शेतातील विहिरीवरून किंवा काही ग्रामस्थांच्या खासगी बोअरवेल आहेत, तेथून महिलांना पाणी आणावे लागत आहे.

...........

गावकऱ्यांकडे ५२ लाख ५० हजार रुपये घरटॅक्स व पाणी कर थकीत आहे . तेव्हा ग्रामस्थांना विनंती आहे की, त्यांनी आपल्याकडील थकबाकी ग्रामपंचायतीकडे भरावी व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.

पुंडलीकराव देशमुख,

प्रशासक ग्रामपंचायत, काजळेश्वर

...........

गावात ६१६ घरगुती नळ कनेक्शन ग्रामपंचायतीने दिली आहेत. मासिक ३० रुपये याप्रमाणे पाणीकर आकारला जातो. ग्रामस्थांनी तो नियमित ग्रामपंचायतीला दिला, तर पाणी समस्या निकाली निघेल. तेव्हा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी विनंती आहे.

सतीश वर्घट

ग्रामविकास अधिकारी, काजळेश्वर