शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे भाविकांच्या आशा पल्लवित

By admin | Updated: April 4, 2017 01:09 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पोहरादेवी येथील कार्यक्रमात दिली. यामुळे पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

मानोरा: देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पोहरादेवी येथील कार्यक्रमात दिली. यामुळे पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेतरविवारी मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी येथे ‘तम काळजी मत कर, विकास वे जाव छ’ या बंजारा भाषेतील वाक्य भाषणाच्या सुरुवातीला वापरून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. बंजारा समाजाचा इतिहास मोठा आहे, त्यांची भाषा व संस्कृती एकच आहे. ना. संजय राठोड व आ. राजेंद्र पाटणी यांनी ज्या पोहरादेवी व बंजारा समाजाच्या विकासाच्या संकल्पना विशद केल्या. त्या सर्व समस्या व विकास हा मुख्यमंत्री या नात्याने आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. यामुळे समाजबांधवांच्या आशा पल्लवित झाल्या असून जगाच्या नकाशावर पोहरादेवी एक सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र म्हणून उदयाला येईल, अशी अपेक्षा समाजाबांधवांमधून व्यक्त होत आहे. या आराखड्यामध्ये बंजारा समाजाचे सण, उत्सव, सेवालाल महाराजांचे प्रसंग, त्यांच्या जीवनामधला क्षण यांची संपूर्ण माहिती असणार आहे. हा संपूर्ण आराखडा एका निश्चित कालावधीत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे समाजबांधवांमधून समाधान व्यक्त झाले. कार्यक्रमाला बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, सेवानिवृत्त न्यायाधीश गोविंद राठोड, शंकर पवार, डॉ. श्याम जाधव, जयकिसन राठोड, जितेंद्र महाराज, एस.डी. राठोड, संजय महाराज, राहुल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थान विकासाबाबत सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कार्याचा गौरवपोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असलेले कार्यतत्पर आमदार म्हणून राजेंद्र पाटणी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार पाटणी यांच्यात असलेल्या विकास कामांच्या तळमळीतून तयार झालेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात कोणतीही उणीव दिसून आली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कारंजा व मानोरा तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून पाटणी यांनी सिंचन विहिरींबाबत आपल्याकडे पाठपुरावा केला. याची दखल म्हणून तीन हजार सिंचन विहिरींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा, तातडीने मान्यता दिली जाईल, असे निर्देश आजच जिल्हाधिकाऱ्यांना देत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.