शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे भाविकांच्या आशा पल्लवित

By admin | Updated: April 4, 2017 01:09 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पोहरादेवी येथील कार्यक्रमात दिली. यामुळे पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

मानोरा: देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पोहरादेवी येथील कार्यक्रमात दिली. यामुळे पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेतरविवारी मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी येथे ‘तम काळजी मत कर, विकास वे जाव छ’ या बंजारा भाषेतील वाक्य भाषणाच्या सुरुवातीला वापरून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. बंजारा समाजाचा इतिहास मोठा आहे, त्यांची भाषा व संस्कृती एकच आहे. ना. संजय राठोड व आ. राजेंद्र पाटणी यांनी ज्या पोहरादेवी व बंजारा समाजाच्या विकासाच्या संकल्पना विशद केल्या. त्या सर्व समस्या व विकास हा मुख्यमंत्री या नात्याने आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. यामुळे समाजबांधवांच्या आशा पल्लवित झाल्या असून जगाच्या नकाशावर पोहरादेवी एक सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र म्हणून उदयाला येईल, अशी अपेक्षा समाजाबांधवांमधून व्यक्त होत आहे. या आराखड्यामध्ये बंजारा समाजाचे सण, उत्सव, सेवालाल महाराजांचे प्रसंग, त्यांच्या जीवनामधला क्षण यांची संपूर्ण माहिती असणार आहे. हा संपूर्ण आराखडा एका निश्चित कालावधीत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे समाजबांधवांमधून समाधान व्यक्त झाले. कार्यक्रमाला बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, सेवानिवृत्त न्यायाधीश गोविंद राठोड, शंकर पवार, डॉ. श्याम जाधव, जयकिसन राठोड, जितेंद्र महाराज, एस.डी. राठोड, संजय महाराज, राहुल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थान विकासाबाबत सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कार्याचा गौरवपोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असलेले कार्यतत्पर आमदार म्हणून राजेंद्र पाटणी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार पाटणी यांच्यात असलेल्या विकास कामांच्या तळमळीतून तयार झालेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात कोणतीही उणीव दिसून आली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कारंजा व मानोरा तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून पाटणी यांनी सिंचन विहिरींबाबत आपल्याकडे पाठपुरावा केला. याची दखल म्हणून तीन हजार सिंचन विहिरींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा, तातडीने मान्यता दिली जाईल, असे निर्देश आजच जिल्हाधिकाऱ्यांना देत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.