शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मंगरुळपीर शहरात बेशिस्त वाहतुकीचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:49 IST

मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत.अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.मंगरुळपीर शहरांत अकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत. अकोला चौक हा शहरातील मुख्य चौक असून, येथूनचअमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिमकडे मार्ग जातात. त्यामुळे दरदिवशी शेकडो वाहनांची वर्दळ येथे सुरू असते. साहजकिच प्रवाशांची संख्याही येथे असते. त्याशिवाय या चौकांत उपाहारगृहे, खाणावळी असून, फळविके्रते, पानटपºया आदिंची गर्दी असतानाच या चौकांत चहुकडे वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवण्यात येतात. मानोरा चौक, बसस्थानक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचीही हीच स्थिती आहे. त्यात मानोरा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान शहरातील सर्वच महत्त्वाची कार्यालये आहेत. यामध्ये पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, विश्रामगृह, भूमीअभिलेख कार्यालय, विश्रामगृह आणि पंचायत समितीचा समावेश आहे. त्यामुळे येथे ग्रामीण भागांतून दरदिवसाला हजारावर लोक विविध कामासाठी येत असतात. या दोन्ही चौकादरम्यान रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. रस्ता अरूंद असल्याने येथे वाहनांची वर्दळ वाढते आणि शहरातील जनतेसह ग्रामीण भागांतून येणाºया लोकांना त्याचा मोठा त्रास होतो. त्यातच बाबासाहेब आंबेडकर चौकातून वाशिम, अमरावती, अकोलाकडे जाणाºया वाहनांची संख्या मोठी असते आणि याच चौकातून शहरात जाणारा एक मुख्य रस्ताही आहे. वाशिम-अमरावती मार्गावर धावणारी वाहने शहरातून येणाºया वाहनधारकाला अगदी चौकात येईपर्यंतही दिसत नाहीत. अशात भरधाव येणाºया वाहनांमुळे अपघाताची भिती आहे. याची दखल घेऊन तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासनाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासह बेकायदा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरTrafficवाहतूक कोंडी