शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नजर पैसेवारी ७0 पैसे!

By admin | Updated: October 9, 2016 01:48 IST

वाशिम जिल्हा प्रशासनाने काढलेली खरिप हंगामाची पैसेवारी अन्यायकारक असल्याचा शेतक-यांचा सूर!

वाशिम, दि. 0८- चालू खरिप हंगामातील नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ७0 पैसे काढण्यात आली आहे. दरम्यान, अधिक पावसामुळे हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबिनसोबतच उडीद, मूग या पिकांपासूनही नुकसान झाले असताना शासनाने जाहीर केलेली पैसेवारी अन्यायकारक असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून उमटत आहे.जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीमध्ये वाशिम तालुक्याची पैसेवारी ७१ पैसे, मंगरूळपीर तालुक्याची पैसेवारी ७0 पैसे; तर रिसोड, मानोरा मालेगाव आणि कारंजा तालुक्याची पैसेवारी ६९ पैसे दाखविण्यात आली असून जिल्ह्यातील सर्वच ७९३ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यात २0१३ ते २0१५ अशा सलग तीन वर्षांमध्ये शेतकर्‍यांनी मोठा दुष्काळ भोगला. यावर्षी प्रारंभी चांगला पाऊस झाला. मात्र, मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने सोयाबिनची अपेक्षित वाढ झालीच नाही. अशातच ऐन सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबिनचे मोठठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. उडिद आणि मूग पिकापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकरी केवळ १ ते १.५ क्विंटलचे उत्पन्न मिळाले; तर अधिकच्या पावसामुळे बाधीत झालेल्या सोयाबिनपासून एकरी २ ते ३ क्विंटल उत्पन्न मिळाले तरी खूप होईल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. सोंगणी आटोपल्यानंतर सुड्या मारून ठेवलेले सोयाबिन देखील भिजल्याने त्याची प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे बाजारपेठेत टाकल्यानंतर खराब झालेल्या सोयाबिनला अपेक्षित दर मिळणार नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. असे असताना शासनाने कुठल्या आधारे ५0 पैशांपेक्षा अधिक पैसेवारी काढली, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. दुष्काळ निवारण मदतीपासून शेतकरी वंचित२0१५-१६ मध्ये खरिप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही शेतकर्‍यांना नापिकीचा सामना करावा लागला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने काढलेल्या ४४ पैशाच्या अंतीम पैसेवारीवरून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला. मात्र, शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेली दुष्काळ निवारण मदत जिल्ह्यातील एकाही शेतकर्‍याच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अशातच यावर्षी अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील अधिकांश गावांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने दुष्काळ निवारण मदत विनाविलंब द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. जिल्हा प्रशासन निश्‍चितपणे शेतकर्‍यांच्या सोबतच आहे. सद्या काढण्यात आलेली खरिप हंगाम नजर अंदाज पैसेवारी शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या आधारावर काढण्यात आली आहे. प्रत्यक्ष हाती आलेल्या उत्पन्नाच्या आधारे अंतीम पैसेवारी काढण्यात येईल. ती अर्थातच उत्पन्न कमी आल्यास कमीच असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी निश्‍चिंत राहावे.- राहुल व्दिवेदीजिल्हाधिकारी, वाशिमशेतकरी म्हणतात-नजर अंदाज पैसेवारी काढण्याची पद्धत इंग्रजकालीन असून ती शेतकर्‍यांबाबत अन्यायकारक आहे. यावर्षीच्या खरिप हंगामात अधिकच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत अगदीच कमी उत्पन्न मिळणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना जिल्हा प्रशासनाने काढलेली पैसेवारी अत्यंत चुकीची आहे.- सुभाष देव्हडे, शेतकरी, दुबळवेलकुठे पावसात प्रदिर्घ खंड; तर कुठे अतवृष्टीसारखी स्थिती उद्भवल्याने खरिप हंगामातील सर्वच पिकांना यंदा जबर फटका बसला आहे. अशा बिकट स्थितीत प्रशासनाने शेतकर्‍यांच्या सोबत असायला हवे. वाशिमचे जिल्हा प्रशासन मात्र शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे.- सुभाष नानवटे, शेतकरी, दोडकी