शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नजर पैसेवारी ७0 पैसे!

By admin | Updated: October 9, 2016 01:48 IST

वाशिम जिल्हा प्रशासनाने काढलेली खरिप हंगामाची पैसेवारी अन्यायकारक असल्याचा शेतक-यांचा सूर!

वाशिम, दि. 0८- चालू खरिप हंगामातील नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ७0 पैसे काढण्यात आली आहे. दरम्यान, अधिक पावसामुळे हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबिनसोबतच उडीद, मूग या पिकांपासूनही नुकसान झाले असताना शासनाने जाहीर केलेली पैसेवारी अन्यायकारक असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून उमटत आहे.जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीमध्ये वाशिम तालुक्याची पैसेवारी ७१ पैसे, मंगरूळपीर तालुक्याची पैसेवारी ७0 पैसे; तर रिसोड, मानोरा मालेगाव आणि कारंजा तालुक्याची पैसेवारी ६९ पैसे दाखविण्यात आली असून जिल्ह्यातील सर्वच ७९३ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यात २0१३ ते २0१५ अशा सलग तीन वर्षांमध्ये शेतकर्‍यांनी मोठा दुष्काळ भोगला. यावर्षी प्रारंभी चांगला पाऊस झाला. मात्र, मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने सोयाबिनची अपेक्षित वाढ झालीच नाही. अशातच ऐन सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबिनचे मोठठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. उडिद आणि मूग पिकापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकरी केवळ १ ते १.५ क्विंटलचे उत्पन्न मिळाले; तर अधिकच्या पावसामुळे बाधीत झालेल्या सोयाबिनपासून एकरी २ ते ३ क्विंटल उत्पन्न मिळाले तरी खूप होईल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. सोंगणी आटोपल्यानंतर सुड्या मारून ठेवलेले सोयाबिन देखील भिजल्याने त्याची प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे बाजारपेठेत टाकल्यानंतर खराब झालेल्या सोयाबिनला अपेक्षित दर मिळणार नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. असे असताना शासनाने कुठल्या आधारे ५0 पैशांपेक्षा अधिक पैसेवारी काढली, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. दुष्काळ निवारण मदतीपासून शेतकरी वंचित२0१५-१६ मध्ये खरिप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही शेतकर्‍यांना नापिकीचा सामना करावा लागला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने काढलेल्या ४४ पैशाच्या अंतीम पैसेवारीवरून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला. मात्र, शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेली दुष्काळ निवारण मदत जिल्ह्यातील एकाही शेतकर्‍याच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अशातच यावर्षी अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील अधिकांश गावांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने दुष्काळ निवारण मदत विनाविलंब द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. जिल्हा प्रशासन निश्‍चितपणे शेतकर्‍यांच्या सोबतच आहे. सद्या काढण्यात आलेली खरिप हंगाम नजर अंदाज पैसेवारी शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या आधारावर काढण्यात आली आहे. प्रत्यक्ष हाती आलेल्या उत्पन्नाच्या आधारे अंतीम पैसेवारी काढण्यात येईल. ती अर्थातच उत्पन्न कमी आल्यास कमीच असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी निश्‍चिंत राहावे.- राहुल व्दिवेदीजिल्हाधिकारी, वाशिमशेतकरी म्हणतात-नजर अंदाज पैसेवारी काढण्याची पद्धत इंग्रजकालीन असून ती शेतकर्‍यांबाबत अन्यायकारक आहे. यावर्षीच्या खरिप हंगामात अधिकच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत अगदीच कमी उत्पन्न मिळणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना जिल्हा प्रशासनाने काढलेली पैसेवारी अत्यंत चुकीची आहे.- सुभाष देव्हडे, शेतकरी, दुबळवेलकुठे पावसात प्रदिर्घ खंड; तर कुठे अतवृष्टीसारखी स्थिती उद्भवल्याने खरिप हंगामातील सर्वच पिकांना यंदा जबर फटका बसला आहे. अशा बिकट स्थितीत प्रशासनाने शेतकर्‍यांच्या सोबत असायला हवे. वाशिमचे जिल्हा प्रशासन मात्र शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे.- सुभाष नानवटे, शेतकरी, दोडकी