शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

निवासी घरांची नुकसानभरपाई तात्काळ द्या - भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST

वाईगौळ या गावातील रस्ता यापूर्वी राज्य महामार्ग म्हणून १९६७ मध्ये विकसित करण्यात आला असून, त्यावेळीही या गावातील नागरिकांच्या जमिनीचा ...

वाईगौळ या गावातील रस्ता यापूर्वी राज्य महामार्ग म्हणून १९६७ मध्ये विकसित करण्यात आला असून, त्यावेळीही या गावातील नागरिकांच्या जमिनीचा मोबदला ग्रामस्थांना देण्यात आलेला नाही व आता या राज्य महामार्गाची दर्जोन्नती २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए अशी करून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेल्या पक्क्या घरांना या राष्ट्रीय महामार्गामुळे बाधा पोहोचणार आहे.

------------------------------------------------------------------

वाईगौळ या गावातील ग्रामस्थांनी येथीलच तरुण विधिज्ञ श्रीकृष्ण राठोड यांच्या मार्गदर्शनात नुकसानभरपाईसंबंधी तहसील कार्यालय ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केलेला असून, प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्याने शिवसेना तालुका प्रमुख रवी पवार यांच्यामार्फत खासदार भावना गवळी यांच्याद्वारे शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याचे लेखी पुरावे ॲड. श्रीकृष्ण राठोड यांच्याकडून देण्यात आल्यानंतर खा. भावना गवळी यांनी या गावातील ग्रामस्थांच्या न्याय्य मागणीला आता वाचा फोडली आहे. ग्रामस्थांच्या तब्बल पन्नास ते साठ वर्षांपासून घरे बांधलेल्या जागेची व घरांची व्यवस्थित मोजणी भूमिअभिलेख विभागामार्फत करण्यात येऊन बाधित ग्रामस्थांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

रा. मा. विभागाकडे वाईगौळ येथील रस्त्याची रुंदी २५ मीटर आहे, याबाबत कुठलेही वैध दस्तावेज उपलब्ध नसल्याने या गावातील नागरिकांना तात्काळ मोबदला देऊन त्यांच्या मनावरील भीतीचा डोंगर दूर करण्यात यावा.

-ॲड. श्रीकृष्ण राठोड, वाईगौळ

पोहरादेवी आणि वाईगौळ ही भविष्यात तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे असल्याने या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना संघर्ष करायला भाग न पाडता त्यांच्या न्याय्य बाजू विचारात घेऊन शांततेने व तातडीने विकास कामे पार पाडली जावीत.

- रवी पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मानोरा