शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

निवासी घरांची नुकसानभरपाई तात्काळ द्या - भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST

वाईगौळ या गावातील रस्ता यापूर्वी राज्य महामार्ग म्हणून १९६७ मध्ये विकसित करण्यात आला असून, त्यावेळीही या गावातील नागरिकांच्या जमिनीचा ...

वाईगौळ या गावातील रस्ता यापूर्वी राज्य महामार्ग म्हणून १९६७ मध्ये विकसित करण्यात आला असून, त्यावेळीही या गावातील नागरिकांच्या जमिनीचा मोबदला ग्रामस्थांना देण्यात आलेला नाही व आता या राज्य महामार्गाची दर्जोन्नती २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए अशी करून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेल्या पक्क्या घरांना या राष्ट्रीय महामार्गामुळे बाधा पोहोचणार आहे.

------------------------------------------------------------------

वाईगौळ या गावातील ग्रामस्थांनी येथीलच तरुण विधिज्ञ श्रीकृष्ण राठोड यांच्या मार्गदर्शनात नुकसानभरपाईसंबंधी तहसील कार्यालय ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केलेला असून, प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्याने शिवसेना तालुका प्रमुख रवी पवार यांच्यामार्फत खासदार भावना गवळी यांच्याद्वारे शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याचे लेखी पुरावे ॲड. श्रीकृष्ण राठोड यांच्याकडून देण्यात आल्यानंतर खा. भावना गवळी यांनी या गावातील ग्रामस्थांच्या न्याय्य मागणीला आता वाचा फोडली आहे. ग्रामस्थांच्या तब्बल पन्नास ते साठ वर्षांपासून घरे बांधलेल्या जागेची व घरांची व्यवस्थित मोजणी भूमिअभिलेख विभागामार्फत करण्यात येऊन बाधित ग्रामस्थांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

रा. मा. विभागाकडे वाईगौळ येथील रस्त्याची रुंदी २५ मीटर आहे, याबाबत कुठलेही वैध दस्तावेज उपलब्ध नसल्याने या गावातील नागरिकांना तात्काळ मोबदला देऊन त्यांच्या मनावरील भीतीचा डोंगर दूर करण्यात यावा.

-ॲड. श्रीकृष्ण राठोड, वाईगौळ

पोहरादेवी आणि वाईगौळ ही भविष्यात तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे असल्याने या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना संघर्ष करायला भाग न पाडता त्यांच्या न्याय्य बाजू विचारात घेऊन शांततेने व तातडीने विकास कामे पार पाडली जावीत.

- रवी पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मानोरा