शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

बसेसच्या प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद, रेल्वे रिकाम्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ५५ दिवस बंद असलेली बससेवा अनलॉकच्या टप्प्यात ७ जूनपासून पूर्ववत झाली. बसमधून ...

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ५५ दिवस बंद असलेली बससेवा अनलॉकच्या टप्प्यात ७ जूनपासून पूर्ववत झाली. बसमधून प्रवास करण्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे; तर दुसरीकडे रेल्वेच्या प्रवासाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.

दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे बसेसच्या प्रवासावरही मर्यादा आल्या. कडक निर्बध लागू होण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच एसटी महामंडळाची ग्रामीण भागातील सेवा बंद केली होती. एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठीच होती. मात्र त्याला प्रतिसाद अतिशय अल्प मिळत होता. अनेक बसेस गेल्या दोन महिन्यांपासून जागेवरच उभ्या होत्या. बससेवा बंद असल्याने महामंडळाला लाखोंचा फटका बसला. आता अनलॉकच्या टप्प्यात कोरोनाचे साखळदंड तोडून एस.टी. सुसाट धावायला लागली आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासी सेवेबरोबर परजिल्ह्यातही एस.टी. धावत आहे. एसटीच्या प्रवासाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे; तर दुसरीकडे मात्र वाशिम येथून रेल्वेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून बहुतांश प्रवासी सावधगिरी बाळगत आहेत; तर काहीजण मात्र मास्कचा वापर करीत नसल्याचेही दिसून येते.

००००००

वाशिम आगाराच्या रोज फेऱ्या ४०

....

रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १५००

...

धावणाऱ्या रेल्वेची संख्या ८

....

प्रवासी १५००

...

बसने अकोल्याला गर्दी

अनलॉकच्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने बसेसला परवानगी मिळाली आहे. वाशिम ते अकोला या मार्गावरील प्रवासाला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. अकोला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत ग्रामीण भागातील बसफेऱ्यांना ५० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.

००००००

रेल्वेला अपेक्षित प्रतिसाद नाही

वाशिम येथील स्थानकावरून रेल्वेने प्रवास करण्याला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे गत तीन दिवसांत दिसून आले. साधारणत: ६० ते ७० प्रवासी वाशिम येथून रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती आहे. अकोला जाण्यासाठी सर्वाधिक पसंती आहे.

००००००

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

कोट बॉक्स

एसटीपेक्षा रेल्वेचे प्रवास भाडे अत्यल्प आहे. अकोला जाण्यासाठी बसपेक्षा रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतो. अत्यावश्यक काम असेल तरच प्रवास केला जातो.

- दत्ता वानखेडे, रेल्वे प्रवासी

.....

कोरोनाकाळात शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न आहे. अत्यावश्यक काम असेल तरच अकोला किंवा अन्य ठिकाणी रेल्वेने प्रवास केला जातो.

- योगेश उबाळे, रेल्वे प्रवासी.

......................

ग्रामीण भागातही बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अत्यावश्यक काम असेल, तर खबरदारी घेऊन बसने प्रवास करतो.

- शिवराम कांबळे, बस प्रवासी

....

कोरोनाकाळात आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेऊन अत्यावश्यक काम असेल तरच एसटीने प्रवास केला जातो.

- मधुकर भगत, बस प्रवासी

०००००००००००

वाशिम आगारातून सध्या १० बसेस धावत आहेत. दिवसभरात ४० फेऱ्या होत असून, प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. दररोज सरासरी १५०० प्रवासी प्रवास करतात.

- विनोद इलामे,

आगारप्रमुख, वाशिम

.....

वाशिममार्गे सध्या ८ रेल्वे धावत आहेत. रेल्वे प्रवासाला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. रेल्वे स्थानकावर आवश्यक ती खबरदारी घेतली जाते.

एम. टी. उजवे,

- रेल्वे स्टेशन मास्तर, वाशिम

०००००००००००००