शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाईन परीक्षेबाबत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याचे पालक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:42 IST

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा आणि प्रॅक्टिकल पुढच्या महिन्यांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाची ...

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा आणि प्रॅक्टिकल पुढच्या महिन्यांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने आढावा घेतला. त्यावेळेस ऑनलाईन परीक्षा घेऊ शकतो का, यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान बोर्डाने परीक्षा घेण्यासाठी आपण पूर्णपणे तयार झाल्याचे स्पष्ट केले; परंतु ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या असल्याने आॅनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा ही ऑफलाईनच होणार आणि परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता असल्याने दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

----

बॉक्स

दहावीतील विद्यार्थ्यांचे पालक

कोट: जिल्ह्यात आठवडाभरातच ५०० लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली. अशात शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा केंद्रावर घेतल्यास केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढीस वाव मिळणार आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने पर्यायी उपायांचा विचार करावा.

-सारिका पवार,

पालक, मंगरुळपीर

-------

कोट: केंद्रावर होणाऱ्या गर्दीतून विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. सुविधा कितीही असल्या तरी त्यामुळे आमचा पाल्य सुरक्षित राहीलच याची खात्री मुळीच नसल्याने आमची चिंता वाढली आहे.

-संतोष लांडगे

पालक, वाशिम

कोट: एकिकडे वाढत्या कोरोनामुळे सकाळी ९ ते ५ पर्यंतच व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवली जात आहेत. परीक्षेला, तर हजारो विद्यार्थी बसणार आहेत. ते केंद्रावर येताच गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढीस मदत होणार नाही का, असा आमचा प्रश्न आहे.

-अजय जयस्वाल,

पालक इंझोरी,

-------------

बारावीतील विद्यार्थ्यांचे पालक

कोट: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जमावबंदीचे आदेश असताना बारावीच्या शालांत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणे मुळीच योग्य नाही. यातून कोरोना संसर्गाची भीती असल्याने आमच्या मनात पाल्याच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे.

कमला महादेव लांडकर,

महिला पालक, वाशिम

------

कोट: वाढत्या कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणावर शासनाने भर दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका नाही का.

-तुकाराम जाधव,

पालक, वाशिम

--------

कोट: कोरोना वाढत असल्याने प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी लावून लग्नातही २५ व्यक्तींनाच सहभागी होण्याची परवानगी दिली. परीक्षेच्या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढणार नाही का, ही चिंता आम्हाला सतावत आहे.

कोट: पांडुरंग मुठाळ,

पालक वाशिम

एकूण विद्यार्थी

८५०००

बारावीचे विद्यार्थी

३४०००

दहावीचे विद्यार्थी

५१०००