शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

३० वर्षांपासून पाणंद रस्त्याची दैना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

वाशिम : तालुक्यातील दगड उमरा येथील पाणंद रस्त्याची अवस्था गेल्या ३० वर्षांपासून अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे ...

वाशिम : तालुक्यातील दगड उमरा येथील पाणंद रस्त्याची अवस्था गेल्या ३० वर्षांपासून अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतात विविध कामांसाठी वाहने, बैलगाडी घेऊन जाणे कठीण झाले असून प्रशासनाकडे मागणी करूनही हा प्रश्न निकाली निघाला नाही.

खरीप हंगामात विविध शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशक, तणनाशकांसह शेतीअवजारे न्यावी लागत आहेत. तथापि, बहुतांश पाणंद रस्त्यांवर चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलमय पाणंद रस्त्याने ये-जा करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील पाणंद रस्त्याची अवस्था गेल्या ३० वर्षांपासून अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तिन्ही ऋतूत शेतात वाहने घेऊन जाणे अडचणीचे ठरत आहे. या रस्त्याचे काम करण्याची तसदी घेण्यात येत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत.

-----------

मंजुरी मिळूनही कामे प्रलंबित

साधारण चार वर्षांपूर्वी महसूल विभागातर्फे पाणंद रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर वाशिम तालुक्यातील इतर भागातील पाणंद रस्ते संदर्भात रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे पाणंद रस्त्यांची कामे थांबविण्यात आली होती. काही दिवसांनी ही कामे सुरू करण्यात आली. मात्र, दगड उमरा परिसरातील रस्त्याच्या कामांना मुहूर्त मिळाला नाही.

^^^^^^^^^^^^