शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

४९१ पैकी केवळ १६१ ग्रामपंचायतींत रोहयोची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST

वाशिम जिल्ह्याची अर्थव्यवस्था बहुतांशी शेती निगडित व्यवसायांवर अवलंबून असून, ७० टक्क्यांपेक्षा अधिक कामगारांचा उदरनिर्वाह हा शेतीच्या भरवशावरच चालतो. त्यामुळे ...

वाशिम जिल्ह्याची अर्थव्यवस्था बहुतांशी शेती निगडित व्यवसायांवर अवलंबून असून, ७० टक्क्यांपेक्षा अधिक कामगारांचा उदरनिर्वाह हा शेतीच्या भरवशावरच चालतो. त्यामुळे खरीप हंगामानंतर रोजगाराची स्थिती गंभीर रूप धारण करते, तर रब्बी हंगामानंतर जिल्ह्यात रोजगार मिळणेच कठीण होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असून, एकूण ४९१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १६१ ग्रामपंचायतींतर्गत रोहयोची केवळ ४५४ कामे केली जात आहेत. या कामांवर २७८४ मजूर कार्यरत असून, त्यापैकी ६२ मजुरांची आधार नोंदणी झालेली नाही. अद्यापही जिल्ह्यातील हजारो कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत असून, त्यापैकी बहुतांश लोकांनी, तर रोजगारासाठी परजिल्ह्यात स्थलांतर सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-----

तालुकानिहाय रोहयोची कामे

तालुका ग्रामपंचायती कामे

मालेगाव ३५ - ८४

मं.पीर ३५ - १२४

कारंजा ३४ - ९६

रिसोड २७ - ४९

मानोरा १७ - ६८

वाशिम १३ - ३३

----------------------------

मानोरा, वाशिम तालुक्यातील स्थिती वाईट

जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतीत रोहयोची ४५४ कामे करण्यात येत असली तरी, वाशिम आणि मानोरा तालुक्यातील स्थिती त्यात अधिकच वाईट आहे. वाशिम तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींत केवळ ३३ कामे सुरू आहेत. तर आर्थिकदृष्ट्या जिल्ह्यात सर्वात मागास असलेल्या मानोरा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींत केवळ ६८ कामे सद्य:स्थितीत केली जात आहेत. या तालुक्यात रोजगाराची स्थिती सर्वात गंभीर असल्याने कामगारांकडून कामांची मागणी वाढली आहे.

------------

मजुरांचे स्थलांतर सुरू

जिल्ह्यात रब्बी हंगामातील कामे संपली असतानाच रोजगाराची समस्या गंभीर झाली असून, दरदिवशी विविध ठिकाणांहून शेकडो मजूर मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सद्य:स्थितीत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे वाढवितानाच त्यांना या कामाबाबत मार्गदर्शनही करणे आवश्यक आहे.

-----------