शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ऑर्डरमध्ये अडकली वीजजोडणी

By admin | Updated: June 2, 2014 01:10 IST

मालेगावात दीड वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला कृषीपंपजोडणीचा ५0 टक्केआकडाही गाठता आला नाही

मालेगाव : बिलाच्या थकित रकमेपोटी तातडीने कृषीपंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कर्तव्याच्या बाबतीत मात्र गाढ झोपी गेली असल्याची बाब कृषीपंप जोडणीच्या विलंबाने उजेडात आणली आहे. दीड वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला कृषीपंप जोडणीचा ५0 टक्के आकडाही गाठता आला नसल्याची शोकांतिका आहे. नवीन ऑर्डर नसल्याने कृषीपंप जोडणीचे काम ठप्प पडले आहे, अशी माहिती समोर येत आहे. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्‍या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. वाशिम जिल्ह्यात १३२५ कृषीपंप व वीजजोडणीचे उद्दिष्ट मिळाले होते. वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपयाप्रमाणे ८८ लाख ११ हजार २५0 रुपये शुल्क एप्रिल ते मे २0१२ मध्येच कृषी विभागाने वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले आहे. आतापर्यंत रिसोड, मालेगाव, मानोरा, वाशिम, मंगरुळपीर व कारंजा या तालुक्याने अध्र्यापर्यंतही वीजजोडणी दिली नाही.नवीन ऑर्डर नसल्याने हा घोळ झाल्याचे सांगितले जात आहे. वीज वितरणने शेतकर्‍यांच्या भावनांशी जणू खेळ मांडला आहे.