शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्रशासकीय मान्यता प्राप्त विहिरींंना कार्यारंभ आदेश द्यावेत !

By admin | Updated: March 27, 2017 13:32 IST

विशेष ग्रामसभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

मानोरा: तालुक्यात १५ आॅगस्ट २०१५ च्या विशेष ग्रामसभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी सत्यजित देविदास शेरे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की मानोरा पंचायत समितीमार्फत ३९२ विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या विहीरींना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे या विहिरी अपूर्ण आहेत. यापैकी सुमारे १५० विहीरींना कार्यारंभ आदेश देताना रोहयोचा प्राधान्यक्रम राबविल्या गेला नाही. ज्या विहिरींना कार्यारंभ आदेश दिले. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. उर्वरित २७२ शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरींना प्रशासकीय मान्यता असली तरी, कार्यारंभ आदेश नसल्याने त्या अपूर्णच आहेत.२०१५ मध्ये ज्यांनी विहिरीसाठी अर्ज केले होते. त्यांनी पुन्हा २०१७ मध्ये अर्ज केले. कृती आराखड्यात असणाऱ्या विहिरी रद्द होत असतील, तर प्रशासनाची पारदर्शकता कोठे आहे, पालकमंत्री सिंचन विहिर योजनेतून १ हजार विहिरींचे लक्ष तालुक्याला आहे. त्याबाबत इश्वरचिठ्ठीद्वारे लाभार्थी निवडले जात आहेत.ही प्रक्रियाही नियमानुसार होताना दिसत नाही. त्यामुळे २०१५ मध्ये ज्या विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाल्या त्या विहिरंींना कार्यारंभ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.