शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय मान्यता प्राप्त विहिरींंना कार्यारंभ आदेश द्यावेत !

By admin | Updated: March 27, 2017 13:32 IST

विशेष ग्रामसभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

मानोरा: तालुक्यात १५ आॅगस्ट २०१५ च्या विशेष ग्रामसभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी सत्यजित देविदास शेरे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की मानोरा पंचायत समितीमार्फत ३९२ विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या विहीरींना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे या विहिरी अपूर्ण आहेत. यापैकी सुमारे १५० विहीरींना कार्यारंभ आदेश देताना रोहयोचा प्राधान्यक्रम राबविल्या गेला नाही. ज्या विहिरींना कार्यारंभ आदेश दिले. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. उर्वरित २७२ शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरींना प्रशासकीय मान्यता असली तरी, कार्यारंभ आदेश नसल्याने त्या अपूर्णच आहेत.२०१५ मध्ये ज्यांनी विहिरीसाठी अर्ज केले होते. त्यांनी पुन्हा २०१७ मध्ये अर्ज केले. कृती आराखड्यात असणाऱ्या विहिरी रद्द होत असतील, तर प्रशासनाची पारदर्शकता कोठे आहे, पालकमंत्री सिंचन विहिर योजनेतून १ हजार विहिरींचे लक्ष तालुक्याला आहे. त्याबाबत इश्वरचिठ्ठीद्वारे लाभार्थी निवडले जात आहेत.ही प्रक्रियाही नियमानुसार होताना दिसत नाही. त्यामुळे २०१५ मध्ये ज्या विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाल्या त्या विहिरंींना कार्यारंभ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.