शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दराअभावी संत्रा उत्पादक शेतकरी संकटात!

By admin | Updated: March 22, 2017 02:57 IST

दरात ७0 टक्के घसरण; चलन तुटवड्याचा परिणाम.

निनाद देशमुख रिसोड, दि. २१- केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यांपासून विस्कळीत झालेले किरकोळ व्यवहार सुरळीत होत असले तरी, संत्रा उत्पादकांना मात्र या निर्णयाचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत संत्र्याच्या दरात तब्ब्ल ७0 टक्क्यांची घट झाली असून, चांगल्या दर्जाच्या संत्र्यालाही खरेदीदार मिळेनासे झाले आहेत.जिल्हय़ात वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा व रिसोड तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी सत्र्यांचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मंगरुळपीर, कारंजा व रिसोड तालुक्यात आहे. रिसोड तालुक्यात जवळपास १५0 हेक्टर बागायती क्षेत्रात संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. एकट्या शेलगाव येथे १0 ते १५ शेतकर्‍यांनी संत्र्याची लागवड केली आहे. वर्षातून दोनदा येणार्‍या संत्र्याला सुरुवातीला नोटाबंदी व आता कॅशलेस व्यवहाराचा जोरदार फटका बसला आहे. मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. कारंजा तालुक्यात १५0 च्यावर शेतकर्‍यांच्या संत्र्याच्या बागा आहेत. आंबिया बहराला पाहिजे तशी किंमत मिळाली नसल्यामुळे मृग बहराच्या संत्र्यातून नुकसान भरून काढता येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते; परंतु नोटाबंदीच्या निर्णयानंतर शासनाने कॅशलेस व्यवहारावर भर दिल्यामुळे व्यापारी शेतकर्‍यांना संत्राबागा खरेदीचा मोबदला रोखीने देण्यात असर्मथ ठरत आहेत. गतवर्षी पाचशे रुपये प्रति दराने विकले जाणारे संत्राफळाचे कॅरेट आता केवळ शंभर ते दीडशे रुपये दराने विकावे लागत आहे. संत्र्याला व्यापार्‍यांकडून भाव मिळत नसल्यामुळे, शेतकर्‍यांना स्वत: बाजारात विक्रीसाठी धाव घ्यावी लागत आहे. मागील वर्षी संत्र्याला चांगला भाव मिळत होता. यंदा मात्र नोटाबंदीमुळे दरात घसरण झाली आहे. पाचशे रुपयांचे कॅरेट शंभर ते दीडशे रुपयाला विकले जात आहे. प्रतवारी चांगली असली तरी, रोख पैशांअभावी खरेदीदारही मिळेनासे झाले आहेत. - नामदेव वाघशेतकरी शेलगाव (रिसोड)