शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चाराटंचाईवर पर्याय; दोनद बु. येथे पौष्टिक गवताची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा ...

कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा छावण्यांमध्ये बांधण्याची वेळ बळीराजावर येते. गुरांच्या पौष्टिक चाऱ्याची गरज भरून निघावी आणि पौष्टिक व सकस गवत गावातच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कारंजा तालुक्यातील दोनद बु.चे सरपंच निरंजन करडे यांनी दोन गुंठे क्षेत्रात पौष्टिक गवताची लागवड केली आहे.

कारंजा लाड तालुक्यातील दोनद बु. गावचे सरपंच निरंजन करडे यांनी अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथून स्वखर्चाने पौष्टिक गवताचे थोंब आणून त्यांच्या शेतात लागवड केली आहे. आता त्यांच्याकडे या गवताचे बी व थोंब तयार झाले आहेत. दोन गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या पौष्टिक गवतात पांढरी आंजण-काळी आंजण, धामण, मारवेल, रोडस - डोंगरी, पवण्या शेडा, पांढरी कुसळ आदी जातीच्या गवताचा समावेश आहे. या गवताची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग गावांना पौष्टिक गवत वाटण्यात येणार आहे. यामुळे कारंजा तालुक्यातील कुरण धन वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वी होईल आणि तालुक्यातील गावागावांत संरक्षित कुरण क्षेत्र विकसित झालेली पहायला मिळतील.

------------------------

पौष्टिक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास होणार मदत

जनावरांना चराईसाठी मोकाट सोडणे, बेसुमार तोड यांमुळे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला असून, गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे पौष्टिक गवत नामशेष झाले आहे. या नामशेष होऊ लागलेल्या पौष्टिक गवतांना समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करून त्यांचा प्रसार महाराष्ट्रातील गावागावात करण्यासाठी पानी फाउंडेशन काम करत आहे. यासाठी समृद्ध गाव स्पर्धेत त्यांनी स्वतंत्र विषय ठेवला असून, या माध्यमातून कुरणाचे व पौष्टिक गवताचे क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे.

-------------

कोट : गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न मिटविण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही पौष्टिक गवताची लागवड दोन वर्षांपूर्वी केली. या गवताची चार वेळा छाटणीही झाली असून, आता पाच प्रकारचे गवत चांगले वाढत आहे. इतर शेतकऱ्यांना थोंब, बी मोफत देऊन या गवताचे क्षेत्र वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

- निरंजन करडे,

सरपंच तथा शेतकरी, दोनद बु.

--------

कोट : भविष्यात जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक गावाने गायरान वनात, उपलब्ध सार्वजनिक जमिनीवर अथवा बांधावर चराईबंदी करून पौष्टिक गवताची लागवड करून जनावरांसाठी राखीव चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ज्यावेळेस आपल्याकडे चाऱ्याची कमतरता भासेल त्यावेळी तो चारा उपलब्ध होईल आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल

- रवींद्र लोखंडे,

तालुका समन्वयक, कारंजा, पानी फाउंडेशन