शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चाराटंचाईवर पर्याय; दोनद बु. येथे पौष्टिक गवताची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा ...

कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा छावण्यांमध्ये बांधण्याची वेळ बळीराजावर येते. गुरांच्या पौष्टिक चाऱ्याची गरज भरून निघावी आणि पौष्टिक व सकस गवत गावातच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कारंजा तालुक्यातील दोनद बु.चे सरपंच निरंजन करडे यांनी दोन गुंठे क्षेत्रात पौष्टिक गवताची लागवड केली आहे.

कारंजा लाड तालुक्यातील दोनद बु. गावचे सरपंच निरंजन करडे यांनी अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथून स्वखर्चाने पौष्टिक गवताचे थोंब आणून त्यांच्या शेतात लागवड केली आहे. आता त्यांच्याकडे या गवताचे बी व थोंब तयार झाले आहेत. दोन गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या पौष्टिक गवतात पांढरी आंजण-काळी आंजण, धामण, मारवेल, रोडस - डोंगरी, पवण्या शेडा, पांढरी कुसळ आदी जातीच्या गवताचा समावेश आहे. या गवताची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग गावांना पौष्टिक गवत वाटण्यात येणार आहे. यामुळे कारंजा तालुक्यातील कुरण धन वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वी होईल आणि तालुक्यातील गावागावांत संरक्षित कुरण क्षेत्र विकसित झालेली पहायला मिळतील.

------------------------

पौष्टिक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास होणार मदत

जनावरांना चराईसाठी मोकाट सोडणे, बेसुमार तोड यांमुळे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला असून, गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे पौष्टिक गवत नामशेष झाले आहे. या नामशेष होऊ लागलेल्या पौष्टिक गवतांना समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करून त्यांचा प्रसार महाराष्ट्रातील गावागावात करण्यासाठी पानी फाउंडेशन काम करत आहे. यासाठी समृद्ध गाव स्पर्धेत त्यांनी स्वतंत्र विषय ठेवला असून, या माध्यमातून कुरणाचे व पौष्टिक गवताचे क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे.

-------------

कोट : गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न मिटविण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही पौष्टिक गवताची लागवड दोन वर्षांपूर्वी केली. या गवताची चार वेळा छाटणीही झाली असून, आता पाच प्रकारचे गवत चांगले वाढत आहे. इतर शेतकऱ्यांना थोंब, बी मोफत देऊन या गवताचे क्षेत्र वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

- निरंजन करडे,

सरपंच तथा शेतकरी, दोनद बु.

--------

कोट : भविष्यात जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक गावाने गायरान वनात, उपलब्ध सार्वजनिक जमिनीवर अथवा बांधावर चराईबंदी करून पौष्टिक गवताची लागवड करून जनावरांसाठी राखीव चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ज्यावेळेस आपल्याकडे चाऱ्याची कमतरता भासेल त्यावेळी तो चारा उपलब्ध होईल आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल

- रवींद्र लोखंडे,

तालुका समन्वयक, कारंजा, पानी फाउंडेशन