शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चाराटंचाईवर पर्याय; दोनद बु. येथे पौष्टिक गवताची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा ...

कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा छावण्यांमध्ये बांधण्याची वेळ बळीराजावर येते. गुरांच्या पौष्टिक चाऱ्याची गरज भरून निघावी आणि पौष्टिक व सकस गवत गावातच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कारंजा तालुक्यातील दोनद बु.चे सरपंच निरंजन करडे यांनी दोन गुंठे क्षेत्रात पौष्टिक गवताची लागवड केली आहे.

कारंजा लाड तालुक्यातील दोनद बु. गावचे सरपंच निरंजन करडे यांनी अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथून स्वखर्चाने पौष्टिक गवताचे थोंब आणून त्यांच्या शेतात लागवड केली आहे. आता त्यांच्याकडे या गवताचे बी व थोंब तयार झाले आहेत. दोन गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या पौष्टिक गवतात पांढरी आंजण-काळी आंजण, धामण, मारवेल, रोडस - डोंगरी, पवण्या शेडा, पांढरी कुसळ आदी जातीच्या गवताचा समावेश आहे. या गवताची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग गावांना पौष्टिक गवत वाटण्यात येणार आहे. यामुळे कारंजा तालुक्यातील कुरण धन वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वी होईल आणि तालुक्यातील गावागावांत संरक्षित कुरण क्षेत्र विकसित झालेली पहायला मिळतील.

------------------------

पौष्टिक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास होणार मदत

जनावरांना चराईसाठी मोकाट सोडणे, बेसुमार तोड यांमुळे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला असून, गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे पौष्टिक गवत नामशेष झाले आहे. या नामशेष होऊ लागलेल्या पौष्टिक गवतांना समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करून त्यांचा प्रसार महाराष्ट्रातील गावागावात करण्यासाठी पानी फाउंडेशन काम करत आहे. यासाठी समृद्ध गाव स्पर्धेत त्यांनी स्वतंत्र विषय ठेवला असून, या माध्यमातून कुरणाचे व पौष्टिक गवताचे क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे.

-------------

कोट : गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न मिटविण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही पौष्टिक गवताची लागवड दोन वर्षांपूर्वी केली. या गवताची चार वेळा छाटणीही झाली असून, आता पाच प्रकारचे गवत चांगले वाढत आहे. इतर शेतकऱ्यांना थोंब, बी मोफत देऊन या गवताचे क्षेत्र वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

- निरंजन करडे,

सरपंच तथा शेतकरी, दोनद बु.

--------

कोट : भविष्यात जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक गावाने गायरान वनात, उपलब्ध सार्वजनिक जमिनीवर अथवा बांधावर चराईबंदी करून पौष्टिक गवताची लागवड करून जनावरांसाठी राखीव चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ज्यावेळेस आपल्याकडे चाऱ्याची कमतरता भासेल त्यावेळी तो चारा उपलब्ध होईल आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल

- रवींद्र लोखंडे,

तालुका समन्वयक, कारंजा, पानी फाउंडेशन