शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी

By admin | Updated: May 29, 2017 01:22 IST

जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख : तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभाग व ‘आत्मा’मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत आयोजित तीन दिवसीय रानमाळ महोत्सव २०१७ चे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव, करडा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. एल. काळे, आत्मा नियामक मंडळाचे सदस्य माणिकराव देशमुख, नीलेश पेंढारकर, विठ्ठल आरु उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाल्या, की, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी ‘रानमाळ’सारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तालुका स्तरावरही असे उपक्रम आयोजित करण्यासाठी कृषी विभाग व आत्माने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार भावना गवळी म्हणाल्या की, शेतकरी व शेतकरी उत्पादक गटांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित ‘रानमाळ महोत्सव’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांची थेट भेट होऊन ग्राहकांना योग्य दरात चांगल्या प्रतीचा शेतमाल खरेदी करण्याची संधी मिळत आहे. शेतमालावर प्रक्रिया, बीजोत्पादन करण्याचे काम अनेक शेतकरी उत्पादक गट करीत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.