शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी

By admin | Updated: May 29, 2017 01:22 IST

जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख : तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभाग व ‘आत्मा’मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत आयोजित तीन दिवसीय रानमाळ महोत्सव २०१७ चे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव, करडा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. एल. काळे, आत्मा नियामक मंडळाचे सदस्य माणिकराव देशमुख, नीलेश पेंढारकर, विठ्ठल आरु उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाल्या, की, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी ‘रानमाळ’सारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तालुका स्तरावरही असे उपक्रम आयोजित करण्यासाठी कृषी विभाग व आत्माने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार भावना गवळी म्हणाल्या की, शेतकरी व शेतकरी उत्पादक गटांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित ‘रानमाळ महोत्सव’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांची थेट भेट होऊन ग्राहकांना योग्य दरात चांगल्या प्रतीचा शेतमाल खरेदी करण्याची संधी मिळत आहे. शेतमालावर प्रक्रिया, बीजोत्पादन करण्याचे काम अनेक शेतकरी उत्पादक गट करीत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.