शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

३१ जागांसाठी दाखल झाले केवळ ३८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST

जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, ...

जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्यांना दिले गेलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याचा मुद्दा समोर करून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचे मान्य करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुढील दोन आठवड्यांत पोटनिवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासनासह इतरांच्या ११ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. सुनावणीअंती न्यायालयाने ४ मे २०२१ रोजी पुनर्विचार याचिका व स्थगिती मागणारे अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे पोटनिवडणूक होणारच यावर शिक्कामोर्तब झाले.

त्यानुसार, जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. २९ जून ते ५ जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. १९ जुलै रोजी मतदान आणि २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून अवघ्या १६ दिवसांनंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीत एकमेकांसमक्ष उभे ठाकलेल्या इच्छुक उमेदवारांकडून ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर विशेष भर दिला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

........................

कोरोनाच्या संकटामुळे प्रचारकार्यावर मर्यादा

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांमध्ये बाधित आढळणाऱ्यांचा आकडा कमीअधिक होत असला तरी पूर्णत: थांबलेला नाही. डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोकाही लागून आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू केले. याअंतर्गत उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा. दुपारी चार वाजेनंतर जाहीररीत्या प्रचार करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

......................

उमेदवारांचा जोर ‘डोअर टू डोअर’ भेटीवर

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत उडी घेतलेल्या उमेदवारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅली काढण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रचार सभा घेतल्यास आणि त्याठिकाणी गर्दी झाल्यास कारवाईची भीती देखील लागून आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा अधिकांश जोर डोअर टू डोअर भेटीवरच असल्याचे बोलले जात आहे.