शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

मुदतीच्या अंतिम टप्प्यात केवळ ३0 टक्के शेततळी

By admin | Updated: March 18, 2017 03:13 IST

प्रशासनाचा आटापिटा ; योजनेला मुदतवाढीची गरज.

मानोरा, दि. १७- राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकर्‍यांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेच्या निर्धारित शेततळय़ांच्या उद्दिष्टातील अंतिम मुदतीच्या शेवटच्या टप्प्यात ३0 टक्के शेततळीच पूर्ण होऊ शकली आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यात दिलेल्या १९00 शेततळय़ांच्या उद्दिष्टापैकी मुदतीच्या अंतिम महिन्यात केवळ ५६८ शेततळी पूर्ण झाली आहेत. उर्वरित १५ दिवसांत १३३२ शेततळी पूर्ण होणे अशक्य असल्याने या योजनेला मुदतवाढ मिळणे गरजेचे झाले आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पावसाअभावी नुकसान सहन करावे लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना अस्तित्वात आणली; परंतु या योजनेतील जाचक व किचकट अटींमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी योजनेकडे बहुतांशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात या योजनेची एप्रिल २0१६ या महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९00 शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेल्या मुदतीच्या अंतिम महिन्यापर्यंत अर्थात मार्च २0१७ च्या दुसर्‍या आठवड्यापयर्ंत जिल्ह्यात केवळ ५६८ शेततळी पूर्ण होऊ शकली आहेत. योजनेतील तोकड्या अनुदानामुळे, तसेच शेततळे घेतल्यानंतरही त्याचा फायदा होण्याची शाश्‍वती नसल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास तयार नाहीत. कृषी विभागाकडे या योजनेंतर्गत मोठय़ा प्रमाणात अर्ज आले असले, तरी प्रत्यक्षात कृषी विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान बहुतांश शेतकरी या योजनेबाबत उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. शेततळ्यासाठी लागणारी मोठी जागा, तसेच शासनाकडून मिळणार्‍या ५0 हजार रुपयांच्या अनुदानात शेततळय़ांचे काम पूर्ण होणे कठीण आहे. महिनाभरात अडीचशे शेततळी कृषी विभागाकडून एप्रिल २0१६ पासून राबविण्यात येत असलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेत सुरुवातीचे १0 महिने शेतकर्‍यांचा प्रतिसाद न लाभल्याने या कालावधीत केवळ २२४ शेततळी पूर्ण होऊ शकली होती; परंतु खरिपाचा हंगाम संपल्यानंतर जागा निश्‍चितीचे काम वेगात झाले आणि अनेक शेतकर्‍यांनी या योजनेचा आधार घेण्यास सुरुवात केली. शिवाय जिल्हाधिकार्‍यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कृषी विभागाचे अधिकारीही जोमाने या योजनेच्या मागे लागले. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत अवघ्या महिनाभरात कृषी विभागाला २५0 पेक्षा अधिक शेततळय़ांचे काम करणे शक्य झाले आहे.