शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुदतीच्या अंतिम टप्प्यात केवळ ३0 टक्के शेततळी

By admin | Updated: March 18, 2017 03:13 IST

प्रशासनाचा आटापिटा ; योजनेला मुदतवाढीची गरज.

मानोरा, दि. १७- राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकर्‍यांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेच्या निर्धारित शेततळय़ांच्या उद्दिष्टातील अंतिम मुदतीच्या शेवटच्या टप्प्यात ३0 टक्के शेततळीच पूर्ण होऊ शकली आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यात दिलेल्या १९00 शेततळय़ांच्या उद्दिष्टापैकी मुदतीच्या अंतिम महिन्यात केवळ ५६८ शेततळी पूर्ण झाली आहेत. उर्वरित १५ दिवसांत १३३२ शेततळी पूर्ण होणे अशक्य असल्याने या योजनेला मुदतवाढ मिळणे गरजेचे झाले आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पावसाअभावी नुकसान सहन करावे लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना अस्तित्वात आणली; परंतु या योजनेतील जाचक व किचकट अटींमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी योजनेकडे बहुतांशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात या योजनेची एप्रिल २0१६ या महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९00 शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेल्या मुदतीच्या अंतिम महिन्यापर्यंत अर्थात मार्च २0१७ च्या दुसर्‍या आठवड्यापयर्ंत जिल्ह्यात केवळ ५६८ शेततळी पूर्ण होऊ शकली आहेत. योजनेतील तोकड्या अनुदानामुळे, तसेच शेततळे घेतल्यानंतरही त्याचा फायदा होण्याची शाश्‍वती नसल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास तयार नाहीत. कृषी विभागाकडे या योजनेंतर्गत मोठय़ा प्रमाणात अर्ज आले असले, तरी प्रत्यक्षात कृषी विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान बहुतांश शेतकरी या योजनेबाबत उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. शेततळ्यासाठी लागणारी मोठी जागा, तसेच शासनाकडून मिळणार्‍या ५0 हजार रुपयांच्या अनुदानात शेततळय़ांचे काम पूर्ण होणे कठीण आहे. महिनाभरात अडीचशे शेततळी कृषी विभागाकडून एप्रिल २0१६ पासून राबविण्यात येत असलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेत सुरुवातीचे १0 महिने शेतकर्‍यांचा प्रतिसाद न लाभल्याने या कालावधीत केवळ २२४ शेततळी पूर्ण होऊ शकली होती; परंतु खरिपाचा हंगाम संपल्यानंतर जागा निश्‍चितीचे काम वेगात झाले आणि अनेक शेतकर्‍यांनी या योजनेचा आधार घेण्यास सुरुवात केली. शिवाय जिल्हाधिकार्‍यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कृषी विभागाचे अधिकारीही जोमाने या योजनेच्या मागे लागले. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत अवघ्या महिनाभरात कृषी विभागाला २५0 पेक्षा अधिक शेततळय़ांचे काम करणे शक्य झाले आहे.