शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप केवळ २७ टक्के!

By admin | Updated: July 16, 2017 02:18 IST

कर्जमाफीतील गुंतागुंतही कायम : बँकांना अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाचा खरीप हंगाम शेतीसाठी सर्वार्थाने वेगळा राहिला असून, एरव्ही १ जुलैपर्यंंतच पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संपत असताना यंदा मात्र १५ जुलैपर्यंंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. दुसरीकडे कर्जमाफीबाबतही बँकांना शासन स्तरावरून अद्याप स्पष्ट निर्देश नसल्याने अथवा यासंदर्भातील सकरुलर मिळाले नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरू शकणारे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात ९५0 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जुलै २0१६ पर्यंंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकर्‍यांना तब्बल ८९0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यंदाच्या हंगामाकरिता ११५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत १५ जुलैपर्यंंत केवळ ३१0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होऊ शकले. कर्ज वाटपाचे प्रमाण घटण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नाही. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. अशातच आता राज्य शासनाने सन २00९ पासूनच्या कर्जमाफीची घोषणा केली. तथापि, या निर्णयाची अंमलबजावणी होऊन थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा झाल्यास ते नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरू शकतात; परंतु यासंदर्भातील अधिकृत घोषणापत्र जिल्ह्यातील एकाही बँकेला अद्याप प्राप्त झालेले नाही. जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून केवळ कर्जपुरवठा करणार्‍या बँकांना २00९ पासून थकीत असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रक्रियेसोबतच कर्जमाफीसंदर्भातील गुंतागुंतही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.