शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप केवळ २७ टक्के!

By admin | Updated: July 16, 2017 02:18 IST

कर्जमाफीतील गुंतागुंतही कायम : बँकांना अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाचा खरीप हंगाम शेतीसाठी सर्वार्थाने वेगळा राहिला असून, एरव्ही १ जुलैपर्यंंतच पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संपत असताना यंदा मात्र १५ जुलैपर्यंंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. दुसरीकडे कर्जमाफीबाबतही बँकांना शासन स्तरावरून अद्याप स्पष्ट निर्देश नसल्याने अथवा यासंदर्भातील सकरुलर मिळाले नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरू शकणारे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात ९५0 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जुलै २0१६ पर्यंंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकर्‍यांना तब्बल ८९0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यंदाच्या हंगामाकरिता ११५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत १५ जुलैपर्यंंत केवळ ३१0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होऊ शकले. कर्ज वाटपाचे प्रमाण घटण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नाही. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. अशातच आता राज्य शासनाने सन २00९ पासूनच्या कर्जमाफीची घोषणा केली. तथापि, या निर्णयाची अंमलबजावणी होऊन थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा झाल्यास ते नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरू शकतात; परंतु यासंदर्भातील अधिकृत घोषणापत्र जिल्ह्यातील एकाही बँकेला अद्याप प्राप्त झालेले नाही. जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून केवळ कर्जपुरवठा करणार्‍या बँकांना २00९ पासून थकीत असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रक्रियेसोबतच कर्जमाफीसंदर्भातील गुंतागुंतही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.