शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यात आढळली केवळ २७ शाळाबाह्य मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी पालकांचे होणारे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या ...

पोटाची खळगी भरण्यासाठी पालकांचे होणारे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली जाते. यंदा दि. १ ते १० मार्च या काळात ही मोहीम राबविण्यात आली. यात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ग्रामीण भागातील बाजार, गावाबाहेरचे पाल, दगडखाणी, मोठी बांधकामे, झोपडपट्ट्या, फुटपाथ आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली. वाशिम जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत केवळ २७ बालके शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.

----------

वाशिम तालुक्यात आढळली सर्वाधिक मुले

जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार १ ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्हाभरात केवळ २७ मुले शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत असून, यात वाशिम तालुक्यातील सर्वाधिक १० मुलांचा समावेश आहे.

------------------

शाळाबाह्य मुलींचे प्रमाण नगण्य

वाशिम जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात केवळ २७ मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यात मुलींची संख्या केवळ ६ असून, एकूण शाळाबाह्य मुलांच्या संख्येत मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.

------------------

३००० हजार कर्मचारी मोहिमेत

वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कामासाठी जिल्हा परिषदेकडून ३००० हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १० मार्चपर्यंत सर्वेक्षण करून शिक्षण विभागाकडे आकडेवारी दिली.

-----------------

कोट : जिल्ह्यात १ ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शासन निर्देशानुसार निर्धारित ठिकाणी सहा तालुक्यात ३००० हजार शिक्षकांनी शाळाबाह्य मुलांची माहिती घेतली. त्यात ६ ते १४ वर्षे वयोगटातील २७ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.

- गजाननराव डाबेराव,

प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जि. प. वाशिम