शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

केवळ ११00 शेतक-यांनी उतरविला पीक विमा!

By admin | Updated: January 14, 2017 01:27 IST

वाशिम जिल्ह्यातील चित्र; कर्जदार शेतक-यांची संख्या ७९४

वाशिम, दि. १३- दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड उदासीनता जाणवून आली. गतवर्षी तब्बल ९ हजार ३५५ शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात पीक विमा काढला होता. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून, १0 जानेवारी या अंतिम मुदतीपर्यंंत केवळ १,११२ शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५00 आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावरून झाला. त्यामुळे खरीप हंगामातील शेतमाल विक्रीतून चालणार्‍या रोखीच्या व्यवहारांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंंत ह्यब्रेकह्ण लागला होता. परिणामी, शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली. अशातच जिल्ह्यातील १.५ लाखांपेक्षा अधिक शेतकरी खातेदार असणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जुन्या नोटा स्वीकारणे आणि नव्या नोटांचा ह्यविड्रॉलह्ण देण्यावर शासनाने बंधने लादल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला. या बँकेत कर्जासाठी अर्ज करूनही अनेक दिवस शेतकर्‍यांना अपेक्षित कर्ज मिळाले नाही. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत (६,९९५) यावर्षी विविध बँकांतून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या केवळ १,१९३ आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांची संख्या देखील यंदा मोठय़ा प्रमाणात घटली असून, कर्ज घेणार्‍या ७९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ९५ हजार रुपये विमा भरला असून, बिगर कर्जदार ३१८ शेतकर्‍यांनी ७७ हजार ८८१ रुपये विमा रक्कम अदा केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.