शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

केवळ ११00 शेतक-यांनी उतरविला पीक विमा!

By admin | Updated: January 14, 2017 01:27 IST

वाशिम जिल्ह्यातील चित्र; कर्जदार शेतक-यांची संख्या ७९४

वाशिम, दि. १३- दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड उदासीनता जाणवून आली. गतवर्षी तब्बल ९ हजार ३५५ शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात पीक विमा काढला होता. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून, १0 जानेवारी या अंतिम मुदतीपर्यंंत केवळ १,११२ शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५00 आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावरून झाला. त्यामुळे खरीप हंगामातील शेतमाल विक्रीतून चालणार्‍या रोखीच्या व्यवहारांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंंत ह्यब्रेकह्ण लागला होता. परिणामी, शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली. अशातच जिल्ह्यातील १.५ लाखांपेक्षा अधिक शेतकरी खातेदार असणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जुन्या नोटा स्वीकारणे आणि नव्या नोटांचा ह्यविड्रॉलह्ण देण्यावर शासनाने बंधने लादल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला. या बँकेत कर्जासाठी अर्ज करूनही अनेक दिवस शेतकर्‍यांना अपेक्षित कर्ज मिळाले नाही. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत (६,९९५) यावर्षी विविध बँकांतून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या केवळ १,१९३ आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांची संख्या देखील यंदा मोठय़ा प्रमाणात घटली असून, कर्ज घेणार्‍या ७९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ९५ हजार रुपये विमा भरला असून, बिगर कर्जदार ३१८ शेतकर्‍यांनी ७७ हजार ८८१ रुपये विमा रक्कम अदा केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.