शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

केवळ ११00 शेतक-यांनी उतरविला पीक विमा!

By admin | Updated: January 14, 2017 01:27 IST

वाशिम जिल्ह्यातील चित्र; कर्जदार शेतक-यांची संख्या ७९४

वाशिम, दि. १३- दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड उदासीनता जाणवून आली. गतवर्षी तब्बल ९ हजार ३५५ शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात पीक विमा काढला होता. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून, १0 जानेवारी या अंतिम मुदतीपर्यंंत केवळ १,११२ शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५00 आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावरून झाला. त्यामुळे खरीप हंगामातील शेतमाल विक्रीतून चालणार्‍या रोखीच्या व्यवहारांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंंत ह्यब्रेकह्ण लागला होता. परिणामी, शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली. अशातच जिल्ह्यातील १.५ लाखांपेक्षा अधिक शेतकरी खातेदार असणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जुन्या नोटा स्वीकारणे आणि नव्या नोटांचा ह्यविड्रॉलह्ण देण्यावर शासनाने बंधने लादल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला. या बँकेत कर्जासाठी अर्ज करूनही अनेक दिवस शेतकर्‍यांना अपेक्षित कर्ज मिळाले नाही. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत (६,९९५) यावर्षी विविध बँकांतून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या केवळ १,१९३ आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांची संख्या देखील यंदा मोठय़ा प्रमाणात घटली असून, कर्ज घेणार्‍या ७९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ९५ हजार रुपये विमा भरला असून, बिगर कर्जदार ३१८ शेतकर्‍यांनी ७७ हजार ८८१ रुपये विमा रक्कम अदा केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.