शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

रिसोड तालुक्यात कांद्याची लागवड

By admin | Updated: July 13, 2014 22:38 IST

शेतकरी कांदा लागवडीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

किनखेडा : पाऊस लांबल्याने उडीद, मूग पीक हातचे निघून गेले आहे. सोयाबीन, तूर, कपाशी या पीक उत्पादनातही काही प्रमाणात घट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जवळपास ६0 ते ७0 एकरात कांद्याच्या गाठीची लागवड झाली आहे. पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत शेतकरीवर्ग नवीन वाटा चोखाळत आहे. कमी एकरात जास्त उत्पादन देणारी वाण शोधत आहेत. भाजीपाला, फळवर्गीय शेतीकडे अनेक शेतकरी वळत आहेत. याप्रमाणेच कांद्याची लागवडही केली जात आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने एक चांगला पर्याय म्हणून अडीच-तीन महिन्यात तयार होणार्‍या कांद्याला पसंती दिली जात आहे. गुजरातमधून आणलेल्या कांदा गाठ (बी) या प्रकाराची लागवड केली जात असल्याचे प्रगतशील शेतकरी पवन बेलोकार यांनी सांगितले. रिसोडचा परिसर, किनखेडा, चिखली, हराळ आदी परिसरात कांद्याची लागवड करण्याकडे शेतकर्‍यांचे कल आहे.

** कांद्याच्या गाठीला सर्वाधिक पसंती

सध्या पाऊस लांबल्याने सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी कांदा लागवडीला प्राधान्य देत आहेत. बी पद्धतीने कांदा तयार होण्यासाठी साधारणत: पाच ते सहा महिन्याचा कालावधी तर कांद्याच्या गाठ पद्धतीने लागवड केली तर अडीच महिन्यात कांदा तयार होतो. गाठ तयार होण्याकरिता तीन-साडेतीन महिने लागतात. गाठ तयार झाल्यानंतर अडीच महिन्यात कांदा तयार होतो. त्यामुळे कांद्याच्या गाठीला 'बळीराजा' प्राधान्य देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे