शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अखेरच्या दिवशी केवळ ९ जणांचे प्रवेश, निवड झालेले २५४ विद्यार्थी मोफत शिक्षणास मुकले

By दिनेश पठाडे | Updated: May 23, 2023 13:23 IST

आरटीई अंतर्गत खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिला जातो.

वाशिम : आरटीई अंतर्गत खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी निवडलेल्या ७७५ पैकी ५२१ जणांचे प्रवेश निश्चित झाले. सोमवारी (दि.२२) अखेरच्या दिवशी केवळ ९ जणांचे प्रवेश झाले.

शैक्षणिक वर्षे २०२३-२४ साठी आरटीई अंतर्गत एप्रिल महिन्याच्या १३ तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने वारंवार मुदतवाढ देण्यात आली. २२ मे पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. यामुदतीत अधिकाधिक प्रवेश होतील अशी अपेक्षा होती.

मात्र त्यानंतरही २५४ जणांचे  प्रवेश बाकी होते. प्रवेशासाठी नव्याने मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पोर्टलवर दिसून आले. मनासारखी शाळा न मिळणे, घरापासून शाळेचे अंतर जास्त असणे अशा विविध कारणांमुळे काही पालकांनी निवड होऊनही पाल्यांचा प्रवेश घेतला नसल्याचे दिसून येते. यंदाही  निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांनी  प्रवेश निश्चित केला नसल्यामुळे रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रतीक्षा यादीतील बालकांचे  प्रवेश पूर्ण क्षमतेने होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, रविवार(दि.२१) पर्यंत आरटीई अंतर्गत ५१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते, त्यानंतर अखेरच्या दिवशी अर्थात सोमवारी ९  प्रवेशांची भर पडली.