शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
4
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
5
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
6
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
7
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
8
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
9
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
10
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
11
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
12
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
13
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
14
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
15
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
16
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
17
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
18
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
19
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
20
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
Daily Top 2Weekly Top 5

नव्यापेक्षा जुने सोयाबीनच खातेय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत दाखल झाले असून, प्रति क्विंटल ८२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ...

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत दाखल झाले असून, प्रति क्विंटल ८२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ९४०० रुपये दर असल्याने नवीनच्या तुलनेत जुनी सोयाबीनचा भाव खात असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ४००० या दरम्यान प्रति क्विंटल दर असतो. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. गत महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार पाहावयास मिळत आहे. आता नवीन सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. वाशिमच्या बाजार समितीत शनिवार, ४ सप्टेंबरपासून नवीन सोयाबीन विक्रीसाठी आले. यावेळी या सोयाबीनला प्रति क्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला. दुसरीकडे जुन्या सोयाबीनला मात्र ७००० ते ९४०० रुपये भाव मिळाला. नवीन सोयाबीन बाजार समितीत येत असल्याने हाच भाव कायम राहील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

....................

भाव गडगडण्याची शक्यता

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने बाजारभाव गडगडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. बाजारभाव गडगडले तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

......................

शेतकरी म्हणतात, बाजारभाव कायम राहावेत

कोट

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. आता सोयाबीन तयार होत असल्याने यापूर्वी असलेला बाजारभाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, बाजारभाव पुन्हा गडगडतील, अशी दाट शक्यता आहे.

- पांडुरंग सोळंके

प्रगतिशील शेतकरी

...................

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांमधून जावे लागते. शनिवारी बाजार समितीत नव्या सोयाबीनला आठ हजारांवर भाव मिळाला ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे; परंतु हाच भाव यापुढेही कायम राहिला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

- संजयकुमार सरनाईक

प्रगतिशील शेतकरी