शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी संघर्ष’चे पदाधिकारी - ठाणेदारांत शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

राज्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या शंकरपट सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, गोवंश व पशुधनाचे संरक्षण व्हायला हवे, ...

राज्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या शंकरपट सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, गोवंश व पशुधनाचे संरक्षण व्हायला हवे, ग्रामीण व शेतीविषयक परंपरांचे जतन व्हावे, गतवर्षी पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाईस पात्र शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र; परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्षात लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्यात यावी, शेतीविषयक वैयक्तिक लाभाच्या योजनांचे रखडलेले अनुदान विनाविलंब अदा करावे आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटना व बैलगाडा मालक-चालक संघटनेने २५ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातील शिवाजी चाैकापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते.

ठरल्यानुसार, बुधवारी सकाळी शेतकरी संघर्ष संघटना आणि बैलगाडी चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजी चाैकात जमले; मात्र तत्पूर्वी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ध्रुवास बावनकर यांनी संघटनेच्या अकोला नाका चाैकस्थित कार्यालयात पोहचून पदाधिकाऱ्यांशी नाहक वाद घातला. असभ्य वर्तणूक केली. तसेच सुमारे २० पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नवीन पोलीस मुख्यालयात आणले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश केडके यांनी मध्यस्थी करून नियमांचे पालन करण्याच्या अटीवर मोर्चाला परवानगी दिली. त्यामुळे ठाणेदारांचा निषेध नोंदवून शिवाजी चाैकातून मोर्चा मार्गस्थ झाला, अशी माहिती शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश आढाव यांनी दिली.

.............

कोट :

शेतकरी संघर्ष संघटनेचा बैलगाडी मोर्चा पूर्वनियोजित होता. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश केडगे यांच्याशी चर्चा करून त्यास परवानगी मिळविली होती; मात्र मोर्चा निघण्यापूर्वीच वाशिम शहर ठाणेदार ध्रुवास बावनकर यांनी संघटनेच्या कार्यालयात येऊन आपल्याशी वाद घातला. असभ्य वर्तणूक केली. संघटनेचे पदाधिकारी, सदस्यांना स्थानबद्ध केले. अशा ठाणेदारांची तत्काळ हकालपट्टी व्हावी या मागणीसाठी लवकरच आंदोलन छेडले जाईल.

- राजू वानखेडे

संस्थापक अध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटना

......................

कोट :

उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी शेतकरी संघर्ष संघटनेच्या बैलगाडी मोर्चास परवानगी नाकारली होती. त्यामुळे त्यांच्या व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश केडगे यांच्या आदेशाचे पालन करून २५ ऑगस्ट रोजी सकाळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य अशा १८ लोकांना स्थानबद्ध केले. त्यांच्याशी कुठलाही वाद घातला नाही किंवा असभ्य वर्तणूक केलेली नाही.

- ध्रुवास बावनकर, ठाणेदार, वाशिम