शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अधिकारी, कर्मचार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:16 IST

वाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देवाशिम नगर परिषद मुख्याधिकारी, अध्यक्षांनी हाती घेतले झाडू!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.या अभियानादरम्यान शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो इ. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह पदाधिकार्‍यांनी रेल्वेस्थानक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध भागातील स्वच्छता करून नागरिकांनी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले आहे. विविध पद्धतीने जनजागृती उपक्रम राबवून जिल्हा स्वच्छ बनविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले होते. याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी केले. तसेच आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, याबाबतसुद्धा मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा, सभापती राहुल तुपसांडे, उमेश मोहळे, बाजार समितीचे सदस्य हिराभाई जानीवाले,  राजूभाऊ जानीवाले, अभियंता विनय देशमुख,  कनिष्ठ अभियंता राजेश घुगरे, स्वच्छता विभागाचे जितू बढेल,  काष्टे, राजेश महाले,  संतोष किरळकर, नागापुरे, यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी, नगर परिषदेचे पदाधिकारी व बाजार समितीमधील सदस्यांची उपस्थिती लाभली होती.

 १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे विशेष जनजागृती अभियानांतर्गत शहरात विविध भागांची स्वच्छता करून जनजागृतीचे कार्य हाती घेण्यात आले आहे.- गणेश शेटेन.प. मुख्याधिकारी, वाशिम

शहर स्वच्छतेला आपण सुरुवातीपासूनच महत्त्व दिले आहे. त्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविणार असलेले ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आले. यामुळे आपला उद्देश सफल झाला. यासाठी सर्व जण तन-मन-धनाने काम करणार आहेत.- अशोक हेडा, नगराध्यक्ष