शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

सिंचन विहिरींवरून अधिकारी, पदाधिकारी आमने-सामने

By admin | Updated: April 7, 2017 01:33 IST

मालेगावचे प्रकरण न्यायप्रविष्ट : केवळ ४९८ विहिरींची कामे सुरू

संतोष वानखडे - वाशिमपालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिरी योजनेंतर्गतच्या लाभार्थी निवडीवरून अधिकारी आणि पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकल्याने संभ्रम निर्माण झाला. ग्रामसभेतून लाभार्थी निवडीचा शासन निर्णय असतानाही अधिकाऱ्यांनी थेट पंचायत समिती स्तरावरुन अर्ज प्रक्रिया राबविल्याची बाब या ठिणगीला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या नावावर ३३०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सदर उद्दिष्ट निश्चित झाल्याच्या काही दिवसांतच पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गच्या तीन हजार विहिरींची भर पडली. एकंदरित सहा हजारांवर सिंचन विहिरींसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, ही प्रक्रिया ग्रामसभेतून न राबविल्याचा मुद्दा उपस्थित करून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात आगपाखड केली. शासन निर्णयानुसार ग्रामसभेतून लाभार्थी निवड झाल्यानंतर ठरावानिशी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असतानाही, जिल्हा प्रशासनाने याउलट प्रक्रिया राबविल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. अगोदर पंचायत समिती स्तरावर अर्ज बोलावून अपात्र-पात्र लाभार्थींची छाननी केल्यानंतर ही यादी ग्रामसभेत ठेवण्यात आली. नेमकी येथेच अधिकारी-पदाधिकाऱ्यांत ठिणगी पडली असून, अद्यापही या ठिणगीची धग कायम असल्याचे दिसून येते. रोजगार हमी योजनेंतर्गतच्या ३३०० विहिरींसाठी लाभार्थी निवड करताना ग्रामसभेच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याचा आरोप करीत मार्च महिन्यात रिसोड येथे सर्वपक्षीय नेत्यांनी धरणे आंदोलनही छेडले होते. सन २०१५-१६ च्या ग्रामसभेच्या आराखड्यातील मंजूर सिंचन विहिरींना प्रशासकीय व तांत्रिक कार्यारंभ आदेश असतानाही, या विहिरी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्या जातात आणि नवीन ३३०० विहिरींसाठी ग्रामसभेचा आदेश डावलून परस्पर प्रशासकीय प्रक्रिया राबविली जाते, असा गंभीर आरोप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनादरम्यान केला होता. या आरोपाचे खंडण करीत लाभार्थी निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ईश्वरचिठ्ठीचा पर्याय निवडल्याचा दावा प्रशासनाने केला. या संभ्रमामुळे विहिरींच्या कार्यारंभ आदेश आणि प्रत्यक्ष कामकाजाच्या कार्यवाहीला गती मिळाली नसल्याचे दिसून येते. पूर्वीच्या विहिरी रद्द ?यापूर्वी रोजगार हमी योजनेतून लाभार्थी निवड करण्यासाठी ग्रामसभा बोलावून कृती आराखडा तयार केला होता. सन २०१५-१६ या वर्षातील ग्रामसभेने मंजूर केलेल्या कृती आराखड्यातील विहिरींच्या कामांना सन २०१६-१७ या वर्षात सुरूवात होणे अपेक्षित होते. या आराखड्यातील विहिरींना तांत्रिक व प्रशासकीय कार्यारंभ आदेश दिलेला असतानाही, विहिरींची कामे सुरू का झाली नाहीत, असा सवाल सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. या विहिरी रद्द केल्याचे जाहीर न केल्याने लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पूर्वीच्या विहिरींना कार्यारंभ आदेश असतानाही प्रशासकीय स्तरावर दिरंगाई का? याचा जाब पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे. आचारसंहितेत ग्रामसभा ?पंचायत समिती स्तरावरून पात्र ठरलेली यादी ग्रामसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आली. या दरम्यान अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता सुरू होती. ग्रामसभेतून या यादीला मंजुरी मिळाली, तर आदर्श आचारसंहितेचा भंग ठरू शकतो, हा मुद्दा रिसोड पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनात आणून दिला होता. रिसोड तालुक्याचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी आचारसंहितेच्या काळात ग्रामसभा घेऊन लाभार्थी निवडीला मंजुरी दिल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आचारसंहितेच्या काळात कुठे-कुठे ग्रामसभा झाल्या, याची माहिती प्रशासनाने घेतल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.