शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जानगीर महाराज संस्थानकडून हजरत मिर्झा बाबांना नैवेद्य अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी भव्य यात्रा महोत्सव साजरा केला जातो; मात्र गत काही दिवसांपासून कोरोना ...

महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी भव्य यात्रा महोत्सव साजरा केला जातो; मात्र गत काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा तीव्र झाल्याने खबरदारी म्हणून इतर सार्वजनिक कार्यक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांवरही प्रशासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

महाशिवरात्रीला महाप्रसादाचा नैवेद्य सर्वप्रथम हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्गाहला अर्पण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती जानगीर महाराज संस्थानने यंदाही कायम राखली. ११ मार्च रोजी दुपारी संस्थानचे मुकुंद चोपडे, प्रशांत देशमुख, संतोष गौर, ओंकार चोपडे व अन्य दोघांनी हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्गाहमध्ये जाऊन विधीवत नैवेद्य अर्पण केला. दरवर्षी महाप्रसादाचा ७५ हजारांहून अधिक भाविक लाभ घेतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द ठेवण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त संस्थानमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संस्थान व प्रशासनातर्फे पूर्वीच करण्यात आले होते. त्यानुषंगाने महेशगीर बाबा यांच्या मार्गदर्शनात संस्थानचे कर्मचारी व पोलीस प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर असल्याचे दिसून आले.