शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

अडाणमध्ये तिघांचा; दस्तापूरच्या धरणात बुडून एकाचा मृत्यू

By सुनील काकडे | Updated: June 17, 2024 20:19 IST

चारही मुले मुस्लिम समाजातील : कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर

वाशिम : कारंजा तालुक्यातील अडाण धरणात बुडून तिघांचा; तर दस्तापूर (ता.मंगरूळपीर) येथील धरणात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना १७ जून रोजी घडल्या. चारही मृतक मुले २० वर्षांआतील असून मुस्लिम समाजातील आहेत. ऐन ईद सणाच्या दिवशी घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेमुळे मृतकांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

दस्तापूरच्या घटनेसंबंधी मिर हिफाजत अली हाशम अली (आसेगाव पो.स्टे.) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा भाचा शे. हुजेफ रियाजोद्दीन (१८, रा.मंगरूळपीर) हा त्याचे मित्र सकलैन शेख फहीम शेख, ओसामा नवाब साहेब, शिज आरीफ मास्टर आणि सै. मुवेद सै. सोहेल यांच्यासमवेत दुपारी १२.३० च्या सुमारास दस्तापूरच्या धरणावर गाडी धुण्यासाठी गेला. मात्र, धरणात उतरलेला शे. हुजेफ रियाजोद्दीन हा परत काठावर आला नाही, अशी माहिती दुपारी ३ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यामुळे धरणाकडे धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने शे. हुजेफचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

दरम्यान, दस्तापूर येथील धरणात बचावकार्य सुरू असतानाच कारंजा तालुक्यातील पिंपरी फाॅरेस्टनजिकच्या अडाण धरणातही तिघे बुडाल्याची घटना घडली. कारंजातील भारतीपुरा येथील रहिवासी रेहान खान हाफीज खान (१९), साईम करीम शेख (१७) आणि इस्पान अली अर्षद अली (१५) ही तीन मुले अडाण धरणावर पोहण्यासाठी गेली होती. धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. संत गाडगेबाबा बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या संपूर्ण चमुने प्रयत्नांची पराकाष्ठा करून दोन्ही घटनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.एकीकडे सणाचा उत्साह; दुसरीकडे आक्रोशसोमवारी जिल्हाभरात बकरी ईदचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. मात्र, याचदिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या धरणांमध्ये बुडून २० वर्षांआतील चार मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आई-वडिलांचा व कुटूंबातील अन्य सदस्यांचा आक्रोश प्रत्येकाचे डोळे पानावणारा ठरला.धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरदरवर्षीच्या पावसाळ्यात धरणांमध्ये बुडून अनेकांना प्राणास मुकावे लागते. तथापि, अशा घटना घडूच नये, यासाठी धरण परिसरात किमान दोन ते तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करायला हवी, अशी मागणी अनेकवेळा पुढे रेटण्यात आली आहे. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. त्यातूनच १७ जून रोजी पुन्हा चार मुलांना धरणाच्या पाण्याने कायमचे कवेत घेतले. या पृष्ठभूमिवर धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे