शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अडाणमध्ये तिघांचा; दस्तापूरच्या धरणात बुडून एकाचा मृत्यू

By सुनील काकडे | Updated: June 17, 2024 20:19 IST

चारही मुले मुस्लिम समाजातील : कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर

वाशिम : कारंजा तालुक्यातील अडाण धरणात बुडून तिघांचा; तर दस्तापूर (ता.मंगरूळपीर) येथील धरणात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना १७ जून रोजी घडल्या. चारही मृतक मुले २० वर्षांआतील असून मुस्लिम समाजातील आहेत. ऐन ईद सणाच्या दिवशी घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेमुळे मृतकांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

दस्तापूरच्या घटनेसंबंधी मिर हिफाजत अली हाशम अली (आसेगाव पो.स्टे.) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा भाचा शे. हुजेफ रियाजोद्दीन (१८, रा.मंगरूळपीर) हा त्याचे मित्र सकलैन शेख फहीम शेख, ओसामा नवाब साहेब, शिज आरीफ मास्टर आणि सै. मुवेद सै. सोहेल यांच्यासमवेत दुपारी १२.३० च्या सुमारास दस्तापूरच्या धरणावर गाडी धुण्यासाठी गेला. मात्र, धरणात उतरलेला शे. हुजेफ रियाजोद्दीन हा परत काठावर आला नाही, अशी माहिती दुपारी ३ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यामुळे धरणाकडे धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने शे. हुजेफचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

दरम्यान, दस्तापूर येथील धरणात बचावकार्य सुरू असतानाच कारंजा तालुक्यातील पिंपरी फाॅरेस्टनजिकच्या अडाण धरणातही तिघे बुडाल्याची घटना घडली. कारंजातील भारतीपुरा येथील रहिवासी रेहान खान हाफीज खान (१९), साईम करीम शेख (१७) आणि इस्पान अली अर्षद अली (१५) ही तीन मुले अडाण धरणावर पोहण्यासाठी गेली होती. धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. संत गाडगेबाबा बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या संपूर्ण चमुने प्रयत्नांची पराकाष्ठा करून दोन्ही घटनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.एकीकडे सणाचा उत्साह; दुसरीकडे आक्रोशसोमवारी जिल्हाभरात बकरी ईदचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. मात्र, याचदिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या धरणांमध्ये बुडून २० वर्षांआतील चार मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आई-वडिलांचा व कुटूंबातील अन्य सदस्यांचा आक्रोश प्रत्येकाचे डोळे पानावणारा ठरला.धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरदरवर्षीच्या पावसाळ्यात धरणांमध्ये बुडून अनेकांना प्राणास मुकावे लागते. तथापि, अशा घटना घडूच नये, यासाठी धरण परिसरात किमान दोन ते तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करायला हवी, अशी मागणी अनेकवेळा पुढे रेटण्यात आली आहे. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. त्यातूनच १७ जून रोजी पुन्हा चार मुलांना धरणाच्या पाण्याने कायमचे कवेत घेतले. या पृष्ठभूमिवर धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे