शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यत्व रद्दच्या भीतीने ओबीसी सदस्य पुरते गोंधळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST

वाशिम : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने तीन जागा कमी ...

वाशिम : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने तीन जागा कमी करून उर्वरित ११ जागांसाठी येत्या दोन आठवड्यात पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे ओबीसी सदस्य पुरते गोंधळले आहेत. दरम्यान, ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संबंधित सर्व सदस्यांनी एकत्र जमत या विषयावर चर्चा केली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायची किंवा कसे, यावर बैठकीत ऊहापोह झाला.

वाशिम जिल्हा परिषदेत विद्यमान ५२ सदस्यांपैकी १४ सदस्य हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) आहेत. त्यातील तीन जागांचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून येत्या दोन आठवड्यात पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, संबंधित तीन जागा कमी होणार असून उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यामुळे चौदाही सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची वेळ ओढवल्याने संबंधितांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

तथापि, अचानक धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान द्यायचे किंवा नेमकी दिशा काय ठरवायची, याबाबत युद्धस्तरावर खल सुरू आहे. त्यानुषंगाने संबंधित सदस्य अशाच प्रकारचे गडांतर ओढवलेल्या राज्यातील अन्य जिल्हा परिषद सदस्यांच्या संपर्कात असून नेमकी काय भूमिका निश्चित होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

..........................

कोट :

विद्यमान जि.प. अध्यक्षांसह दोन सभापतींना निर्णयाचा फटका

जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे आसेगाव जि.प. सर्कलमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत. यासह विजय खानझोडे (काटा सर्कल) आणि शोभा गावंडे (तळप बु.) हे विद्यमान सभापतीही ओबीसी प्रवर्गातील असून पुन्हा निवडणूक घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकालाने किमान तुर्तास तरी संबंधितांना मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.

...............

कोट :

अचानक धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वच सदस्य गोंधळात सापडले आहेत. त्यानुषंगाने ५ मार्च रोजी दुपारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पुढची दिशा नेमकी काय राहणार, याबाबत चर्चा केली. राज्यशासन पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे शासन आणि ओबीसी सदस्य आपापल्या परीने याप्रकरणी लढा देतील.

- चंद्रकांत ठाकरे

अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम