शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सदस्यत्व रद्दच्या भीतीने ओबीसी सदस्य पुरते गोंधळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST

वाशिम : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने तीन जागा कमी ...

वाशिम : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने तीन जागा कमी करून उर्वरित ११ जागांसाठी येत्या दोन आठवड्यात पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे ओबीसी सदस्य पुरते गोंधळले आहेत. दरम्यान, ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संबंधित सर्व सदस्यांनी एकत्र जमत या विषयावर चर्चा केली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायची किंवा कसे, यावर बैठकीत ऊहापोह झाला.

वाशिम जिल्हा परिषदेत विद्यमान ५२ सदस्यांपैकी १४ सदस्य हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) आहेत. त्यातील तीन जागांचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून येत्या दोन आठवड्यात पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, संबंधित तीन जागा कमी होणार असून उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यामुळे चौदाही सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची वेळ ओढवल्याने संबंधितांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

तथापि, अचानक धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान द्यायचे किंवा नेमकी दिशा काय ठरवायची, याबाबत युद्धस्तरावर खल सुरू आहे. त्यानुषंगाने संबंधित सदस्य अशाच प्रकारचे गडांतर ओढवलेल्या राज्यातील अन्य जिल्हा परिषद सदस्यांच्या संपर्कात असून नेमकी काय भूमिका निश्चित होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

..........................

कोट :

विद्यमान जि.प. अध्यक्षांसह दोन सभापतींना निर्णयाचा फटका

जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे आसेगाव जि.प. सर्कलमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत. यासह विजय खानझोडे (काटा सर्कल) आणि शोभा गावंडे (तळप बु.) हे विद्यमान सभापतीही ओबीसी प्रवर्गातील असून पुन्हा निवडणूक घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकालाने किमान तुर्तास तरी संबंधितांना मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.

...............

कोट :

अचानक धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वच सदस्य गोंधळात सापडले आहेत. त्यानुषंगाने ५ मार्च रोजी दुपारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पुढची दिशा नेमकी काय राहणार, याबाबत चर्चा केली. राज्यशासन पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे शासन आणि ओबीसी सदस्य आपापल्या परीने याप्रकरणी लढा देतील.

- चंद्रकांत ठाकरे

अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम