शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सदस्यत्व रद्दच्या भीतीने ओबीसी सदस्य पुरते गोंधळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST

वाशिम : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने तीन जागा कमी ...

वाशिम : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने तीन जागा कमी करून उर्वरित ११ जागांसाठी येत्या दोन आठवड्यात पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे ओबीसी सदस्य पुरते गोंधळले आहेत. दरम्यान, ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संबंधित सर्व सदस्यांनी एकत्र जमत या विषयावर चर्चा केली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायची किंवा कसे, यावर बैठकीत ऊहापोह झाला.

वाशिम जिल्हा परिषदेत विद्यमान ५२ सदस्यांपैकी १४ सदस्य हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) आहेत. त्यातील तीन जागांचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून येत्या दोन आठवड्यात पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, संबंधित तीन जागा कमी होणार असून उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यामुळे चौदाही सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची वेळ ओढवल्याने संबंधितांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

तथापि, अचानक धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान द्यायचे किंवा नेमकी दिशा काय ठरवायची, याबाबत युद्धस्तरावर खल सुरू आहे. त्यानुषंगाने संबंधित सदस्य अशाच प्रकारचे गडांतर ओढवलेल्या राज्यातील अन्य जिल्हा परिषद सदस्यांच्या संपर्कात असून नेमकी काय भूमिका निश्चित होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

..........................

कोट :

विद्यमान जि.प. अध्यक्षांसह दोन सभापतींना निर्णयाचा फटका

जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे आसेगाव जि.प. सर्कलमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत. यासह विजय खानझोडे (काटा सर्कल) आणि शोभा गावंडे (तळप बु.) हे विद्यमान सभापतीही ओबीसी प्रवर्गातील असून पुन्हा निवडणूक घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकालाने किमान तुर्तास तरी संबंधितांना मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.

...............

कोट :

अचानक धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वच सदस्य गोंधळात सापडले आहेत. त्यानुषंगाने ५ मार्च रोजी दुपारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पुढची दिशा नेमकी काय राहणार, याबाबत चर्चा केली. राज्यशासन पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे शासन आणि ओबीसी सदस्य आपापल्या परीने याप्रकरणी लढा देतील.

- चंद्रकांत ठाकरे

अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम