शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST

वाशिम : खरीप हंगामातील कांद्याला बाजारात अधिक दर मिळतात व इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळते. त्या दृष्टीने ...

वाशिम : खरीप हंगामातील कांद्याला बाजारात अधिक दर मिळतात व इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना खरीप कांदा पीक उत्पादनाविषयी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र, वाशिमच्या वतीने ‘खरीप कांदा -रोपवाटिका व्यवस्थापन व लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या निवृत्ती पाटील उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी कांदा हे भारतीय आहारातील महत्त्वाचे पीक असून फळे व भाजीपाला पिकामध्ये सर्वांत जास्त परदेशी चलन पीक असल्याचे स्पष्ट केले.

परंतु इतर देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता खूप कमी असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकतासुद्धा कमी असल्याचे सांगून त्यामागील महत्त्वाची कारणे व संभाव्य उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

खरीप हंगामातील कांदा लागवडीतील बारकावे विषद करताना योग्य जमिनीची निवड, योग्य व शिफारशीत वाणांचा वापर, बीज प्रक्रिया व रोपवाटिका व्यवस्थापन, अन्नद्रव्य व ओळीत व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन आदींविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांनी बहु पीक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी व त्यादृष्टीने अधिक बाजारभाव व जास्त नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने खरीप हंगामात कांदा उत्पादन घ्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.